नंदुरबार | प्रतिनिधी
श्रद्धा वालकरची ३५ तुकडे करून हत्या करणार्या लव्ह जिहादी नराधम आफताबला तत्काळ फासावर लटकवा, राज्यात लवकरात लवकर मलव्ह जिहाद विरोधी कायदाफ आणि धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, मलव्ह जिहाद ची प्रकरणे हाताळण्यासाठी वा त्यांचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी, अशा मागण्या करीत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने संतप्त महिलांनी निवेदन सादर केले.

या निवेदनात म्हटले आहे की, पालघर येथील आफताब पुनावाला हा नराधमाने श्रद्धा वालकर या हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत लिव इन मध्ये रहात होता. श्रद्धाने लग्न करण्याविषयी त्याच्याकडे आग्रह धरल्यावर आफताबने तिचे ३५ तुकडे करत निघृणपणे हत्या केली. ही घटना अतिशय सुन्न करणारी आणि देशभरातील युवतींमध्ये दहशत निर्माण करणारी आहे. या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
ही केवळ पहिली घटना नसून काही दिवसापूर्वी मुंबईतील टिळकनगर येथे रहाणारी रुपाली चंदनशिवे या युवतीने बुरखा घालण्यास नकार दिला, म्हणून तिचा पती इक्बाल मोहम्मद शेख याने तिची गळा चिरून हत्या केली होती. अशाच लव्ह जिहादच्या घटना कोल्हापूर, मालेगाव आणि अमरावतीसह राज्यभरात उघडकीस आल्या आहेत. या अत्यंत गंभीर समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्रात तात्काळ लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यात आला.
यावेळी रमा कदम, उमा कदम, नम्रता परदेशी, गिता बागुल,भावना कदम,भारती पंडीत, आशा चौधरी, नयना मुळे, माधुरी मराठे हे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने उपस्थित होते.








