Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लॉकडाऊन काळात मत्स्यपालनाचा आधार

Mahesh Patil by Mahesh Patil
September 1, 2021
in कृषी
0
लॉकडाऊन काळात मत्स्यपालनाचा आधार
नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील खडकी येथील वैष्णवी महिला बचत गटाने आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतीय संविधान अनुच्छेद 275 (1) अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना मत्समारीसाठी तरंगते पिंजरे पुरविणे या योजनेतून मत्स्यपालन सुरू केल्याने  कोरोना संकटाच्या काळात रोजगाराच्या समस्या निर्माण होत असताना गटातील सदस्यांना आधार मिळाला आहे.
वैष्णवी बचत गटातील कामी महिलांचा उदरनिर्वाह शेतमजूरीवर तर काहींचा शेतीवर चालतो. या महिलांना येणाऱ्या मर्यादीत उत्पन्नात कुटुंबाचा खर्च चालविणे कठीण जात असे. दोन वर्षापूर्वी या महिलांना सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयामार्फत पिंजऱ्यातील मत्स्यपालनाविषयी माहिती मिळाली. गावालगत पाझर तलाव असल्याने गटामार्फत मत्स्यपालन करण्याचा निर्णय या महिलांनी घेतला.
बचत गटाला  तरंगते पिंजरे, मत्स्यबोटुकली, तरंगते खाद्य, बिगर यांत्रिकी बोट, यांत्रिकी बोट, रसायने व प्रशिक्षणासाठी 23 लाख 66 हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. केंद्र शासनाच्या या योजनेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार कार्यालयामार्फत मंजूरी देण्यात आली.
बचत गटातील आदिवासी महिलांना नंदुरबार, मुंबई आणि पुणे येथे आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर खडकी तलावात पिंजरे लावण्यात आले. पहिल्या वर्षी पुरेसा अनुभव नसल्याने फारसा लाभ मिळाला नाही. मात्र या महिलांनी जिद्द सोडली नाही. येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढीत त्यांनी व्यवसाय सुरू ठेवला.
गटातील महिला सदस्यांना कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील मदत केली. बोट चालविण्यासाठी मुलांची मदत होते. एकूण सहा पिंजऱ्यांपैकी दोनमध्ये मत्स्य बोटुकली टाकण्यात येते. मासे मोठे झाल्यावर इतर चार पिंजऱ्यात टाकण्यात येतात. वर्षभरात सुमारे 10 टन मासे विक्रीसाठी उपलब्ध होतात. स्थानिक बाजारपेठेत 60 ते 95 रुपये प्रतिकिलो दराने माशांची विक्री करण्यात येते.
मत्स्य व्यवसायामुळे गटातील प्रत्येक महिलेला साधारण 1 लाख रुपयापर्यंत फायदा होतो असे गटाच्या अध्यक्षा सविता गावीत यांनी संगितले. पूरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालन महिलांना चांगले उत्पन्न देणारे असल्याचे त्या म्हणाल्या.
मासे विक्रीच्या व्यवहाराची नोंद ठेवण्यात येते. मासे विक्रीनंतर गटातील सदस्यांना त्यांच्या गरजेनुसार मिळालेली रक्कम वाटप करण्यात येते. पिंजऱ्यातील जाळी कुरतडल्यामुळे थोडे नुकसानही होत असल्याचे महिलांनी सांगितले. जाळ्यांची दुरुस्ती करून त्या वापरण्यात येतात. हळूहळू व्यवसायातील बारकावे या महिला शिकत आहेत. त्यांनी स्विकारलेला उत्पन्नाचा हा चाकोरीबाहेरील मार्ग निश्चितच कौतुकास्पद आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

खुनाची धमकी देणारे व्हॉटसअप स्टेटस ठेवण दोघांना पडले महागात, पोलीसांनी दाखल केला गुन्हा

Next Post

खुनाची धमकी देणारे व्हॉटसअप स्टेटस ठेवण दोघांना पडले महागात, पोलीसांनी दाखल केला गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025
बनारस येथे शिकणाऱ्या धडगाव तालुक्यातील युवकाविरुद्ध प्रक्षोभक व्हिडिओ तयार केल्याप्रमाणे गुन्हा दाखल

बनारस येथे शिकणाऱ्या धडगाव तालुक्यातील युवकाविरुद्ध प्रक्षोभक व्हिडिओ तयार केल्याप्रमाणे गुन्हा दाखल

October 20, 2025
अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, खासदार गोवाल पाडवी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, खासदार गोवाल पाडवी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

October 20, 2025
‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group