नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात यंदा एकूण ८६० मंडळाकडून गणरायाची स्थापना करण्यात आली होती. उद्या अनंत चतुर्थीच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील २३७ गणेश मंडळातर्फे गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. यात १२१ सार्वजनिक गणेश मंडळ ९८ खाजगी तर १८ एक गांव एक गणपती मंडळांचा समावेश आहे.
शासनाने यंदा गणेशोत्सवासाठी सर्व नियम शिथील करण्यात आल्याने कोरोना नंतर प्रथमच जिल्ह्यात गणेश उत्सव मोठया उत्साहात साजरा होत आहे. यावर्षी जिल्ह्यात ८६० मंडळाकडून गणरायाची स्थापना करण्यात आली होती. यात ४२३ सार्वजनिक, ३३८ खाजगी व ९९ एक गाव एक गणपतींचा समावेश होता. यामध्ये ८ टप्यांमध्ये गणरायाचे विसर्जन करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
यात दिड दिवसाचा गणपतीमध्ये एका मंडळाकडून गणरायाचे विसर्जन करण्यात आले. तिसर्या दिवशी चार मंडळाकडून गणरायाला निरोप देण्यात आला तर दि.४ सप्टेंबर रोजी पाचव्या दिवशी २५८ मंडळाकडून गणरायाला निरोप देण्यात आला तर दि.५ सप्टेंबर रोजी जिल्हाभरात एकूण ७३ गणेश मंडळाकडून गणेश विसर्जन करण्यात आले तर दि.६ सप्टेंबर रोजी सातव्या दिवशी १९४ गणेश मंडळातर्फे गणरायाला निरोप देण्यात आला.
आठव्या दिवशी पाच व काल दि.८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ८९ गणेश मंडळांतर्फे गणेशाचे विसर्जन करण्यात आले. यात सार्वजनिक ४५, खाजगी ४२ तर दोन एक गांव गणपतीचा समावेश होता. अनंत चतुर्थीच्या दिवशी जिल्ह्याभरात २३७ गणेश मंडळातर्फे गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. यामध्ये नंदुरबार शहर पोलीस ठाणे अंतर्गत ३० सार्वजनिक, ११ खाजगी, उपनगर पोलीस ठाणे अंतर्गत ५ सार्वजनिक, २ खाजगी,
तालुका पोलीस ठाणेतर्ंगत १४ सार्वजनिक, ५ एक गांव एक गणपती, नवापूर पोलीस ठाणेतर्ंगत २९ सार्वजनिक एक खाजगी, विसरवाडी पोलीस ठाणेतर्ंगत १ सार्वजनिक, एक एक गांव एक गणपती, शहादा पोलीस ठाणेतर्ंगत १८ सार्वजनिक, ७५ खाजगी तर ३ एक गांव एकगणपती, म्हसावद पोलीस ठाणेतर्ंगत २ सार्वजनिक, ३ खाजगी, ५ एक गांव एक गणपती, सारंगखेडा पोलीस ठाणेतर्ंगत ४ सार्वजनिक, ४ खाजगी, २ एक गांव एक गणपती, धडगांव पोलीस ठाणेतर्ंगत ५ सार्वजनिक, १ खाजगी, २ एक गांव एक गणपती,
अक्कलकुवा तालुक्यातील ८ सार्वजनिक, एक खाजगी, तळोदा पोलीस ठाणेतर्ंगत २ सार्वजनिक, मोलगी पोलीस ठाणेतर्ंगत ३ सार्वजनिक असे १२१ सार्वजनिक, ९८ खाजगी, १८ एक गांव एक गणपती असे एकूण २३७ गणेश मंडळातर्फे गणरायांना निरोप देण्यात येणार आहे. दरम्यान गणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान कुठलीही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस दलातर्फे एक पोलीस अधिक्षक, एक अप्पर पोलीस अधिक्षक, ६ पोलीस उपअधिक्षक, १९ पोलीस उपनिरीक्षक, ६१ सहायक पोलीस निरीक्षक तथा उपनिरीक्षक, ७२९ पोलीस अंमलदार, १९४ महिला पोलीस अंमलदार , ५ स्ट्रायकिंग फोर्स, दोन आरसीटी, दोन क्यु.आर.टी., एक एसआरपीएफ कंपनी तर ६०० होमगार्ड असा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.