नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील हातधूई येथे बहिणीला मारहाण का केली असा जाब विचारल्याच्या रागातून घरात घुसून कुटूंबाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील हातधूई येथील निर्मला राजा प्रसाद यांची लहान बहिण सुनंदा हिला का मारले असा जाब विचारला. याचा राग आल्याने प्रमोद बारकू वळवी, बारकू ईरमा वळवी, बाजूबाई बारकू वळवी व बालीबाई बारकू वळवी यांनी निर्मला प्रसाद यांचे वडीलांचे घरात प्रवेश केला. तसेच प्रमोद वळवी याने निर्मला प्रसाद यांचा हात पिळून हाताबुक्यांनी मारहाण केली व घरातील अशोक दिनकर वळवी, सारपबीई सांद्या वळवी, दिनकर ईरमा वळवी यांनाही हाताबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत निर्मला प्रसाद यांचे मंगळसुत्र तुटून नुकसान झाले.
तसेच शिवीगाळकरीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत निर्मला प्रसाद यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध भादंवि कलम ४५२, ४२७, ३२३ ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोना.स्वप्निल गोसावी करीत आहेत.