तळोदा l प्रतिनिधी
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना आमदार होऊ दिले नाही. त्यांच्याच मांडीवर आज चंद्रकांत रघुवंशी जाऊन बसले आहेत. म्हणून संघटना नव्याने पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. असे प्रतिपादन आ.आमश्या पाडवी यांनी केले.


तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालयात शिवसेना पक्षाच्या वतीने संसरपयोगी साहित्य वाटप कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधानपरिषद आ.आमश्या पाडवींसह संपर्क प्रमुख अरुण चौधरी, जिल्हा समन्वय दिपक गवते, जि.प.सभापती तथा जिल्हा प्रमुख गणेश पराडके, प्रदेश संघटक सुरेखा वाघ, युवा सेना जिल्हा प्रमुख अर्जुन मराठे, माजी नगरसेवक विनोद चौधरी, के.जी परदेशी, बच्छुसिंग परदेशी, किशोर परदेशी, विलास काकडे, युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटील, गिरीश मराठे, घारू कोळी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपस्थित ५०० कुटुंबीयांना संसारपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी आ. पाडवी पुढे बोलताना म्हणाले की, सत्ता असतांना दोघेही नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, आता सत्ता बदल होतात ते पक्ष सोडून गेलेत सत्ता जिथे ते तिथे ते असतात अशी खोचक टीका केली. उध्दव ठाकरे यांना काही आमदार सोडून गेले, मात्र आजही बाळासाहेब यांचे नाव वापरून सत्ता स्थापनेचा प्रयत्न करीत आहेत,
बाप चोरण्याची संस्कृती रुजविण्याचे काम त्यांनी केले आहे. कोणत्याही पक्षाने आजपर्यंत आदिवासी समाजाच्या व्यक्तीला जिल्ह्यातून विधानपरिषदेचे आमदार केलेले नाही, मात्र शिवसेनेने ते करून दाखवलं आहे. तळोद्यातील शिवसेना नेहमीच सर्वसामान्यांच्या जनतेसाठी उभी राहते. आगामी निवडणुकीत पालिकेवर सेनेचा भगवा फडकवण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले.
जिल्हा समन्वय दिपक गवते, सह संपर्क प्रमुख अरुण चौधरी, यांनी मनोगतात जिल्ह्यातून पक्ष बदलून गेलेले आमदार रघुवंशी यांच्यावर टीका करत ते आपले नसल्यामुळे त्यांचे जाण्याचे दुःख नसल्याचे सांगितले. भविष्यात सर्वांनी उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. याशिवाय सदस्य नोंदणी व प्रतिज्ञापत्र अधिकाधिक सादर करण्याचे आवाहन केले.
नगरसेविका प्रतीक्षा दुबे यांनी, सत्ते स्थापनेसाठी एक गट एकूण ५६ आमदार व खासदार घेवून गेलेत, आपण भविष्यात १५६ निवडून आणू, जे आपल्यातून निघून गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते अशी उपरोधात्मक टीका दुबे यांनी प्रस्तावनेतून केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हितेंद्र पाटील यांनी केले. आभार जितेंद्र दुबे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहर प्रमुख जितेंद्र दुबे,संजय पटेल, पुत्तन दुबे, सूरज माळी, विजय मराठे, जगदीश चौधरी, विपुल कुलकर्णी, श्रावण तिजविज, जयेश सुर्यवंशी, नितीन ठाकरे, विनोद वंजारी, नितेश सोनार, काशिनाथ कोळी, अमन ठाकरे, कल्पेश सुर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.








