म्हसावद l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील हाटमोहिदा येथे जिल्ह्यातील महर्षी वाल्मिकी यांचे प्रथम मंदिर उभारण्यात आले आहे. “रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन ना जाई” अश्या रघुकुलाचे उदात्या स्वरूपाचे वर्णन करणारे आद्य रामायण कार महर्षी वाल्मिकी यांच्या मंदिराचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
रामायणकर महर्षी वाल्मिकी यांचा जन्म टोकरे कोळी जमातीत झाला असून हे या जमातीचे आद्य दैवत आहे, हाट मोहिदा, गावातील बांधवांनी मंदिर उभारून टोकरे कोळी जमातीचे अस्तित्व टिकवण्यात सिंहाचा वाटा निभवला आहे. मंदिरात स्थापलेली मूर्ती अतिशय सुदंर असून जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्धी पावणार आहे.
मंदिरामुळे आगामी काळात ग्रामपंचायतीला मोठा लाभ होऊन हे पर्यटनाचे केंद्र होण्यासाठी येथे वाल्मीकी जयंतीला यात्रेचे स्वरूप देण्याचे नियोजन करण्याबाबत हेमंतकुमार सूर्यवंशी, संस्थापकअध्यक्ष सामाजिक हक्क संरक्षण व प्रबोधन समिती, नंदुरबार यांनी स्थानिक समाज बांधवांसोबत चर्चा केली आहे.या कार्यक्रमाप्रसंगी नंदुरबार जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, शेतकरी संघ अध्यक्ष बी. के.पाटील, रोहिदास राठोड, विलास विठ्ठल पाटील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, सरपंच किशोर ईदास पाटील हाट मोहीदा, नवापुरचे युवा सेनेचे किशन शिरसाठ,रोहीत निकम, पंकज बुधा कोळी,मा पो पाटील नामदेव कोळी, वसंत कोळी, भरत कोळी, हरी कोळी, नरेंद्र बागुल, दीपक बागुल, आनंदा कोळी, सुरेश कोळी, सतिश कोळी, काशिनाथ कोळी, गिरधर कोळी, बन्सी कोळी, गुलाब कोळी, रवींद्र कोळी, व सर्व समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
मंदिर उद्घाटन समयी ॲड. राम रघुवंशी म्हणाले की, मंदिराचे भूमिपूजन आमच्या हातून झाले होते आणि उद्घाटन देखील आमच्या हाती झाले हे आमचे सौभाग्य होय.
महर्षी वाल्मिकी ऋषींची शिकवण आयुष्यभर प्रत्येक माणसासोबत राहील आणि राहणारच. भैय्यासाहेबांनी शब्द दिला होता की मंदिराचे काम आम्ही पूर्ण करू आणि तो शब्द पूर्ण केला.गावाच्या हितासासाठी, लोकांसाठी, ग्रामस्थांसाठी जे जे कामे योग्य असतील ती कामे अर्ध्या रात्री पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले.