नंदूरबार l प्रतिनिधी
आदिवासी समाजात वन हक्क व पेसा कायदा याबाबत उदासीनता दिसून येते. तसेच त्यांच्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक याप्रकारातही उदासीनता दिसून येते. म्हणून या कायद्याच्या माध्यमातून त्यांच्या सर्वांगिक विकास हा शाश्वत तंत्रज्ञानाचा वापर करणे हे महत्वाचे आहे. तसेच, जंगलामधून मिळणारे वनउपज उत्पादनाचे विपणन करण्यासाठी मार्गदर्शन या केंद्राद्वारे मिळणार आहे. त्या अनुषंगाने मंगळवार रोजी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत युनिसेक इंडिया संचालित वन हक्क व पेसा सूक्ष्म नियोजन आणि संसाधन व्यवस्थापन केंद्र, तसेच शाश्वत तंत्रज्ञान आदिवासी केंद्र या दोन कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून आभासी पद्धतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे डॉ.राजेंद्र भारुड हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी नंदुरबार मिनल करनवाल यांनी महिलांशी संवाद साधला. तसेच, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रमोदकुमार पवार (अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नंदुरबार), डॉ.राजेंद्र दहातोंडे (वरिष्ठ शास्रज्ञ प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार), उमेश भदाणे (मंडळ कृषी अधिकारी, कोरीट), प्रशांत हुमणे (वनक्षेत्रपाल, नंदुरबार), दीपक पाटील (संचालक, युनिसेक इंडिया), संजय इंगळे (प्रकल्प संचालक, युनिसेक इंडिया) हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला पेसा अंतर्गत येणार्या नंदुरबार जिल्ह्यामधील गावांतील बचत गटातील महिला व पुरुष मोठ्या संखेने उपस्थित होते. तसेच शशिकांत मराठे (प्रकल्प संचालक), परवेश खाटिक (केंद्र समन्वयक) तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक बैसाणे यांनी केले व आभार प्रदर्शन गोविंद साळुंके यांनी केले. तसेच इतर प्रशिक्षित सहकार्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.