भारतीय स्वांत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिवीर नेहमीच अग्रेसर होते. सिद्धू कान्हा, राणी गायडीनल्लू, बिरसा मुंडा, राणी दुर्गावती मडावी, राणा पुंजा भिल, खाज्या नाईक, झलकारी बाई, तंट्या मामा, राघोजी भांगरे, भीमा नाईक, नंदुरबार जिल्ह्यातील किरसिंग भील, रुमाल्या नाईक असे अगणित नावे समोर येतात.
इ.स. सन १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिवीर देखिल मागे नव्हते त्याच्यातील खाज्या नाईक एक धुरंदर नेतृत्व सातपुडा परिसरामध्ये इंग्रजांविरुद्ध लाखो आदिवासी स्त्री, पुरुष तरुणांना घेऊन इंग्रजांशी दगड, कुर्हाडे, गोफण, भाला घेऊन लढत होते. खाज्या नाईक हे इंग्रजांच्या पोलीस खात्यात नोकरी करत होते. कलेक्टर मेन्सफिल्ड याने सेंधवा ते शिरपूर या ४० मैल च्या रस्त्यावर त्यांची नेमणूक केली होती. खाज्या नाईक प्रामाणिकपणे वीस वर्षे काम केले. परंतु एकेदिवशी गुन्ह्याचा तपास करण्याच्या कामात त्यांच्या हातून एक गुन्हेगाराच्या कबुली जवाब घेताना गुन्हेगार मारला गेला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना दहा वर्षाची शिक्षा दिली. जेलमध्ये खाज्या नाईक यांची वागणूक चांगली असल्यामुळे पाच वर्षाची शिक्षा माफ करण्यात आली आणि ई स. १८५५ झाली त्यांना पुन्हा सोडण्यात आले. १८५७ मध्ये खाज्या नाईक यांची सेंधवा ते शिरपूर घाटात पुन्हा नेमणूक करण्यात आली पण स्वातंत्र्याचा आणि आदिवासी, पारंपरिक जीवनावर होणारे विविध घटना डोळ्यासमोर येत असल्याने नोकरी सोडून स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले.
भीमा नाईक, कालू बाबा, बालू रावत असे अनेक साथीदार त्यांना मिळाले. भीमा नाईक आणि खाज्या नाईक यांनी शिरपूरला संयुक्तपणे २९ ऑक्टोबर १८५७ रोजी हल्ला केला. त्यात एक हजार पाचशे आदिवासींनी भाग घेतला होता. इंग्रज कॅप्टन याने त्यांच्या ५६ किलोमीटर पाठलाग गेला. परंतु त्याला काही हाती लागले नाही. पुन्हा १ ऑक्टोंबर १८५७ ला खाज्या नाईक, भीमा नाईक यांनी इंग्रज सरकारच्या कलेक्टरच्या नाका जवळून लूट करून कमालच केली. तेव्हापासून पुन्हा कलेक्टरांना चांगली जरब बसला.१७ नोव्हेंबर १८५७ पर्यंत इंग्रजांविरुद्ध लढ्यासाठी खाजा नाईक यांनी स्त्री-पुरुष तरुण असे करून १५०० आदिवासींची मोठी तुकडी तयार केली होती आणि इंग्रजांच्या विरोधात लढत होते. त्यावेळच्या खानदेशच्या हद्दीपासून तीस मैलावर उत्तरेस होळकरांच्या हद्दीतल्या जामली चौकीजवळ इंदोरहून मुंबईकडे जाणारा सात लाखांचा खजिना बैलगाडीतून जात होता. तो त्यांनी लुटला आणि ब्रिटिश सत्तेला जबरदस्त आव्हान दिले. त्या काळात खाज्या नाईक यांचे घर सेंधवा येथे होते. ११ एप्रिल १८५७ इंग्रांविरुध्द मोठी लढाई सुरू होती. हा अंबापाणी संग्राम इतिहासात अजरामर आहे. खाज्या नाईक, दौलतसिंग नाईक, नाईक भीमा नाईक यासारखे क्रांतिकारी साथीदार एकत्रित झाले होते. डोंगराच्या शिखरावर खडकाचा आश्रय घेऊन लढत होते. बंडखोर आदिवासींच्या स्त्रियादेखील या लढाईमध्ये मागे नव्हते. या लढ्यात अनेक आदिवासी शहीद झाले. काहींना जिवंत पकडून त्यांना लष्करी डोल वाजून गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या लढाईत खाज्या नाईकचा मुलगा दौलतसिंग मारला गेला. या लढाईत ४६० क्रांतिवीर शहीद झाले होते. खाज्या नाईक यांची बायको भीमा नाईक यांचे पुतणे असे अनेक स्त्रिया होत्या. पुढे अनेक चकमकीनंतर खाज्या नाईक इंग्रजांच्या हाती लागले तेव्हा इंग्रजांनी खाज्या नाईक यांचे डोके कापून लिंबाच्या झाडाला आठ दिवस टांगून ठेवले होते. अशा या भारतीय इतिहासातील थोर क्रांतीविरांची शहीद दिवस तारीख निश्चित नाही पण ११ एप्रिल १८५८ रोजी आंबापाणी स्वातंत्र्य संग्रामात ४६०० आदिवासी क्रांतिवीर शहीद झाले. निमित्ताने १२ एप्रिल रोजी सातपुडा परिसरात या दिवसाला क्रांतिवीर बहादूर खाज्या नाईक प्रेरणा दिवस म्हणून साजरी करतात.
इ.स. सन १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिवीर देखिल मागे नव्हते त्याच्यातील खाज्या नाईक एक धुरंदर नेतृत्व सातपुडा परिसरामध्ये इंग्रजांविरुद्ध लाखो आदिवासी स्त्री, पुरुष तरुणांना घेऊन इंग्रजांशी दगड, कुर्हाडे, गोफण, भाला घेऊन लढत होते. खाज्या नाईक हे इंग्रजांच्या पोलीस खात्यात नोकरी करत होते. कलेक्टर मेन्सफिल्ड याने सेंधवा ते शिरपूर या ४० मैल च्या रस्त्यावर त्यांची नेमणूक केली होती. खाज्या नाईक प्रामाणिकपणे वीस वर्षे काम केले. परंतु एकेदिवशी गुन्ह्याचा तपास करण्याच्या कामात त्यांच्या हातून एक गुन्हेगाराच्या कबुली जवाब घेताना गुन्हेगार मारला गेला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना दहा वर्षाची शिक्षा दिली. जेलमध्ये खाज्या नाईक यांची वागणूक चांगली असल्यामुळे पाच वर्षाची शिक्षा माफ करण्यात आली आणि ई स. १८५५ झाली त्यांना पुन्हा सोडण्यात आले. १८५७ मध्ये खाज्या नाईक यांची सेंधवा ते शिरपूर घाटात पुन्हा नेमणूक करण्यात आली पण स्वातंत्र्याचा आणि आदिवासी, पारंपरिक जीवनावर होणारे विविध घटना डोळ्यासमोर येत असल्याने नोकरी सोडून स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले.
भीमा नाईक, कालू बाबा, बालू रावत असे अनेक साथीदार त्यांना मिळाले. भीमा नाईक आणि खाज्या नाईक यांनी शिरपूरला संयुक्तपणे २९ ऑक्टोबर १८५७ रोजी हल्ला केला. त्यात एक हजार पाचशे आदिवासींनी भाग घेतला होता. इंग्रज कॅप्टन याने त्यांच्या ५६ किलोमीटर पाठलाग गेला. परंतु त्याला काही हाती लागले नाही. पुन्हा १ ऑक्टोंबर १८५७ ला खाज्या नाईक, भीमा नाईक यांनी इंग्रज सरकारच्या कलेक्टरच्या नाका जवळून लूट करून कमालच केली. तेव्हापासून पुन्हा कलेक्टरांना चांगली जरब बसला.१७ नोव्हेंबर १८५७ पर्यंत इंग्रजांविरुद्ध लढ्यासाठी खाजा नाईक यांनी स्त्री-पुरुष तरुण असे करून १५०० आदिवासींची मोठी तुकडी तयार केली होती आणि इंग्रजांच्या विरोधात लढत होते. त्यावेळच्या खानदेशच्या हद्दीपासून तीस मैलावर उत्तरेस होळकरांच्या हद्दीतल्या जामली चौकीजवळ इंदोरहून मुंबईकडे जाणारा सात लाखांचा खजिना बैलगाडीतून जात होता. तो त्यांनी लुटला आणि ब्रिटिश सत्तेला जबरदस्त आव्हान दिले. त्या काळात खाज्या नाईक यांचे घर सेंधवा येथे होते. ११ एप्रिल १८५७ इंग्रांविरुध्द मोठी लढाई सुरू होती. हा अंबापाणी संग्राम इतिहासात अजरामर आहे. खाज्या नाईक, दौलतसिंग नाईक, नाईक भीमा नाईक यासारखे क्रांतिकारी साथीदार एकत्रित झाले होते. डोंगराच्या शिखरावर खडकाचा आश्रय घेऊन लढत होते. बंडखोर आदिवासींच्या स्त्रियादेखील या लढाईमध्ये मागे नव्हते. या लढ्यात अनेक आदिवासी शहीद झाले. काहींना जिवंत पकडून त्यांना लष्करी डोल वाजून गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या लढाईत खाज्या नाईकचा मुलगा दौलतसिंग मारला गेला. या लढाईत ४६० क्रांतिवीर शहीद झाले होते. खाज्या नाईक यांची बायको भीमा नाईक यांचे पुतणे असे अनेक स्त्रिया होत्या. पुढे अनेक चकमकीनंतर खाज्या नाईक इंग्रजांच्या हाती लागले तेव्हा इंग्रजांनी खाज्या नाईक यांचे डोके कापून लिंबाच्या झाडाला आठ दिवस टांगून ठेवले होते. अशा या भारतीय इतिहासातील थोर क्रांतीविरांची शहीद दिवस तारीख निश्चित नाही पण ११ एप्रिल १८५८ रोजी आंबापाणी स्वातंत्र्य संग्रामात ४६०० आदिवासी क्रांतिवीर शहीद झाले. निमित्ताने १२ एप्रिल रोजी सातपुडा परिसरात या दिवसाला क्रांतिवीर बहादूर खाज्या नाईक प्रेरणा दिवस म्हणून साजरी करतात.
बातमी शेअर करा