Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पपई तोड करणाऱ्या मजुरांच्या मजूरीत ५० रुपयांची वाढ केल्याने पाच दिवसापासून सुरू असलेला संपाचा तिढा सुटला

Mahesh Patil by Mahesh Patil
December 30, 2021
in कृषी
0
पपई तोड करणाऱ्या मजुरांच्या मजूरीत ५० रुपयांची वाढ केल्याने  पाच दिवसापासून सुरू असलेला संपाचा तिढा सुटला

तळोदा l प्रतिनिधी
गेल्या चार,पाच दिवसांपासून पपई तोड करणाऱ्या मजुरांच्या मजूरी वाढविण्याबाबत व्यापाऱ्यांनी सकारात्मकता दाखवून त्यांचा मागणी नुसार ५० रुपये मजूरी वाढविल्यान संपाच्या तिढा सुटूल्यामुळे मजुरांनी देखील संप मागे घेतला आहे. त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तथापि मजुरांच्या या वाढीव मजुरीच्या भार व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांवर लादू नये.अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पपईची तोड करणाऱ्या मजुरांना पपईचे व्यापारी प्रती टन साडे तीनशे रुपये मजूरी देत असतात. परंतू वाढत्या महागाईमुळे ही मजूरी परवडत नसल्याने मजुरांनी गेल्या चार ,पाच दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले होते.या मजुरांची टणास व्यापाऱ्यांनी पन्नास रुपयांची वाढ करावी अशी त्यांची मागणी होती.मात्र मजुरांच्या या संपामुळे शेतकऱ्यांची पपई तोड देखील थांबली होती.साहजिकच शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत होते.कारण झाडावरच पपई पिकून खाली पडत होती.शिवाय वेगवेगळ्या रोगांच्या प्रादुर्भाव देखील होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा अडचणीत मोठी वाढ झाली होती.साहजिकच मजुरांच्या या वाढीव मजूरी बाबत व्यापाऱ्यांनी तोडगा काढावा अशी शेतकऱ्यांची देखील अपेक्षा होती.मजुरांच्या संपाची दखल घेवून मंगळवारी शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथे बैठक घेण्यात आली.या बैठकीत व्यापारी ब मजुरांचे प्रतिनिधी उपस्थित होते.वाढीव मजूरी बाबत चर्चा होवून मागणी नुसार टणास पन्नास रुपये वाढीव दर वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे मजुरांनी देखील आपले कामबंद आंदोलन मागे घेवून पपई तोडणीस जाण्याचा निर्णय घेतला.व्यापारी व मजूर यांच्या सकारात्मक निर्णयाचे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.तथापि या वाढीव मजुरीच्या भार व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांवर लादू नये अशीही अपेक्षा शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे.कारण पपई तोडीची मजूरी हे व्यापारी आपल्या खिशातून न देता शेतकऱ्यांकडून वसूल करीत असतात.सद्या ३५० मजूरी शेतकरी कडून घेतली जात आहे.त्यामुळे हा वाढीव भुर्दंड व्यापर्यानीच सोसावा असेही शेतकरी सांगतात.
सातत्याने घसरतोय आहे पपईच्या दर
सातत्याने पपईच्या दर घसरत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे.पपईच्या उत्पादनावर केलेला आर्थिक खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी अक्षरशः हवालदील झाला आहे.कारण रासायनिक खते,पपईची रोपे व लागवडीच्या अवाढव्य खर्च पाहता तेवधाही निघत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. सध्या तर पावणे तीनशे रुपये पपईच्या भाव झाला आहे. स्थानिक काही व्यापाऱ्यांच्या मनमानी धोरणाच्या फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप आहे.व्यापाऱ्यांनी मजुरांप्रमानेच पपईच्या पुरेशा दराबाबत सकारात्मक विचार करावा.अशी शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अथक प्रयत्नांनी मुलीला मिळाले जीवदान, पाच लाखात एखाद्याला होतो गॅस गॅंग्रीन आजार

Next Post

ऑनलाइन परीक्षांना पर्यायी व्यवस्था म्हणून ऑफलाईन परीक्षेची सुविधा द्या: जितेंद्र ढोले.

Next Post
ऑनलाइन परीक्षांना पर्यायी व्यवस्था म्हणून ऑफलाईन परीक्षेची सुविधा द्या: जितेंद्र ढोले.

ऑनलाइन परीक्षांना पर्यायी व्यवस्था म्हणून ऑफलाईन परीक्षेची सुविधा द्या: जितेंद्र ढोले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

October 21, 2025
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

October 21, 2025
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group