Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सरकारी कर्मचारी व अधिकार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्या ३१ जुलैपर्यंत,ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Mahesh Patil by Mahesh Patil
July 10, 2021
in राज्य
0

नंदुरबार | प्रतिनिधी-
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी कोरोनाचा संसर्ग अद्याप कायम आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता विचारात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने प्रशासकीय बदल्यांना केवळ दि.१४ ऑगस्ट २०२१ पर्यंत परवानगी दिली आहे. १४ ऑगस्टनंतर कोणत्याही बदल्या करता येणार नाही, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या आदेशामध्ये केवळ विहित कालावधीत पूर्ण झालेल्या १५ टक्के मर्यादित सर्वसाधारण बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्य सरकारने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, सद्यस्थितीत महाराष्ट्र हे कोरोना बाधित राज्य आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेची संभाव्य शक्यता लक्षात घेता बदली भत्त्यावरील खर्च मर्यादित करण्यात येत आहे. सर्वसाधारण बदल्या या एकूण कार्यरत पदांच्या १५ टक्के एवढ्या मर्यादेत बदली अधिनियमातील कलम ६ अन्वये सक्षम प्राधिकार्‍याच्या मान्यतेने कराव्यात.या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा संबंधित पदावर कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अशाच कर्मचार्‍यांच्या बदल्या कराव्यात. या बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात यावी.
यानंतर जी पदं रिक्त राहतील त्या पदांवर विशेष कारणास्तव बदली करण्यास १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट काळात परवानगी असते.
विशेष कारणास्तव करावयाच्या बदल्या या एकूण कार्यरत पदांच्या १० टक्के एवढ्या मर्यादेत करण्यात याव्यात. सर्वसाधरण बदल्या तसेच विशेष कारणास्तव बदल्या करताना नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी प्राप्त करण्याची व बदली अधिनियमातील सर्व तरतुदींचे पालन करण्याची दक्षता घ्यावी.ज्या विभागांमध्ये बदलीची कार्यवाही करण्यासाठी संगणकीय प्रणाली पुर्णत: किंवा अंशत: विकसित केली आहे, अशा विभागांनी या प्रणालीचा वापर करावा, असे शासन आदेशात म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता-जिल्हा कृषि हवामान केंद्र

Next Post

जिल्ह्यात १२ जुलै पासून बालकांना न्युमोकोकल लस टोचली जाणार

Next Post

जिल्ह्यात १२ जुलै पासून बालकांना न्युमोकोकल लस टोचली जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीरामपूर गावातील महिला व पुरुषांनी एकीच्या बळावर गावाला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केले पात्र :चंद्रकांत मोरे

श्रीरामपूर गावातील महिला व पुरुषांनी एकीच्या बळावर गावाला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केले पात्र :चंद्रकांत मोरे

October 2, 2023
गांधी चौकात शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्वच्छता अभियानात सहभाग

गांधी चौकात शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्वच्छता अभियानात सहभाग

October 2, 2023
शनिमांडळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संतोष पाटील यांची बिनविरोध निवड

शनिमांडळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संतोष पाटील यांची बिनविरोध निवड

October 2, 2023
स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी : जि .प . अध्यक्षा डॉ .सुप्रिया गावित

स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी : जि .प . अध्यक्षा डॉ .सुप्रिया गावित

October 2, 2023
स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले; स्वच्छ भारत अभियान घराघरात पोचले :डॉ. विजयकुमार गावित

स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले; स्वच्छ भारत अभियान घराघरात पोचले :डॉ. विजयकुमार गावित

October 2, 2023
खांडबारा गावात मुलभूत सुविधांचा अभाव नागरीक त्रस्त, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष शिवसेनेचा आंदोलनाचा ईशारा

खांडबारा गावात मुलभूत सुविधांचा अभाव नागरीक त्रस्त, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष शिवसेनेचा आंदोलनाचा ईशारा

October 1, 2023

Total Views

  • 3,599,166 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group