म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद व परिसरात
आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तुफानी वारा व विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे शेतकर्यांच्या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या आठ आठवड्यापासून नंदुरबार जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी परीसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. आज दि.१९ मार्च रोजी पुन्हा अवकाळी पावसाने पुन्हा धुमाकुळ घातल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तुफानी वारा व विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाने अनेक भागात झोडपले.दरम्यान तालुक्यातील पिंप्री, अवघे,जुनवणे, आमोदा, फत्तेपुर,कुसुमवाडा,
चिखली,कानडी,सुलवाडे,सुल्तानपूर यासह विविध गावात सुमारे दोन ते अडीच तास पाऊस झाला.यात परिसरातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर गहु,हरभरा, मका,सोयाबीन, विविध पीकांचे नुकसान झाले आहे.राज्य कर्मचार्यांचा संप केव्हा मिटेल व शेतकर्यांच्या नुकसान झालेल्या पीकांचे केव्हा पंचनाम होईल या चिंतेत शेतकरी वर्ग दिसुन येत आहे.या अवकाळी पावसामुळे तीन तास वीज खंडित करण्यात आली आहे. यामुळे सायंकाळच्या सुमारास मुख्य बाजारपेठ तसेच मुख्य बसस्थानक चा परिसर पुर्णतः शुकशुकाट दिसून आला .
दरम्यान गोगपुर परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.