नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार येथील माळी वाड्यात संत सावता महाराज मंदिर परिसरात माजी उपनगराध्यक्ष कै. राजेंद्र माळी यांच्या स्मरणार्थ सावता माळी मंडळातर्फे नगराध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी,गजेंद्र शिंपी यांच्या हस्ते वड पिंपळ औदुंबर इत्यादी वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी ऍड. राम रघुवंशी यांनी महामारी कोरोना काळात वृक्षारोपणाचे महत्व विशद करीत सांगितले की सध्या वड व पिंपळाचे वृक्षरोपण करून त्यांचे रक्षण करणे काळाची गरज असून आपली सर्वांची जबाबदारी आहे. जेणेकरून भविष्यात ऑक्सीजन वायूचा अभावाने कोणीही मृत्युमुखी पडणार नाही.तसेच प्रदूषण मुक्त भारत देश समृद्धी आपला सहभाग असावा म्हणून प्रत्येकाने किमान एक वृक्षरोपण करून रक्षण करण्याचे आवाहन तरुणांना केले.यावेळी जगन्नाथ माळी, विजय माळी, कैलास माळी, देवाजी माळी ,विजय बोडरे,बापू महाजन, धर्मेंद्र पाटील,संभाजी माळी,रमेश महाजन,भरत माळी,कमलाकर माळी,काशिनाथ माळी, महेंद्र माळी, अविनाश माळी , कुणाल माळी,आनंद माळी,सुनील माळी सह परिसरातील समाज बांधव कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.