Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पुन्हा अज्ञात माथेफिरुकडून पपईसह कापसाचे पीक उध्वस्त, हाता तोंडाशी आलेला घास गेला

Mahesh Patil by Mahesh Patil
August 18, 2021
in क्राईम
0
पुन्हा अज्ञात माथेफिरुकडून पपईसह कापसाचे पीक उध्वस्त, हाता तोंडाशी आलेला घास गेला
तळोदा ! प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बोरद येथील शेतकरी दत्तू रोहिदास पाटील यांच्या बोरद शिवारातील गट क्रमांक 214 मधील शेतातील उभ्या असलेल्या पपई पिकाची काठीच्या सहाय्याने एका अज्ञात माथेफिरुने, पपईचे 20-30 झाडे कापल्याच्या घटनेने शेतकऱ्यांमध्ये हळहळ निर्माण होत आहे. तसेच बोरद येथील जयसिंग चिंधा ठाकरे व बालम तुकड्या पवार यांच्या करणखेडा रस्त्याला असलेल्या शेतातील कापसाच्या पिकाची सुद्धा नासधूस करून 40-50 झाडांची कत्तल केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. बोरद पोलिस दूरक्षेत्रात एका आठवड्यात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांकडून हळहळ निर्माण होत आहे.
         सदरील घटना अशी की, सोमवार रोजी रात्री 8 ते 12 दरम्यान शेतात कुणीही नसल्याच्या अंदाज घेत एका अज्ञात माथेफिरुने, स्वतः जवळ असलेल्या काठीच्या सहाय्याने पिकाची नासधूस करत साधारण 20 ते 30 झाडांची कत्तल केली. पपईच्या पिकाला अर्ध्यापासून मोडल्याचे शेतकरी यांच्या मार्फत सांगण्यात आले. पाच-सहा महिन्याच्या पपईच्या पिकाची अशा प्रकारे नासधूस झाल्यामुळे, हातातोंडाशी आलेला घास त्या माथेफिरूने हिरावून घेतल्याने, परिसरात हळहळ निर्माण होऊन, संताप व्यक्त करण्यात येतो आहे.
    याबाबत शेतमालकाने तळोदा पोलीस स्टेशन येथे दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, एकही पोलीस कर्मचारी तेथे पहाणीसाठी उशिरापर्यंत आले नसल्याने शेतकऱ्यांना कुणी वालीच नसल्याचे बोलले जात आहे. मुळात बोरद दूरक्षेत्रात पोलीस कर्मचारी हजर रहाणे अपेक्षित असतांना तेथे एकही कर्मचारी हजर नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
          सदरील शेतकऱ्याने एप्रिल महिन्यांत पपई पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे सहा महिन्याच्या पपईला बऱ्यापैकी फळ व फुल्लर आल्याने चांगल्या प्रकारे उत्पन्न निघाले असते. परंतु सदरील शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असून, हातातोंडाशी आलेला घास गेल्याने सदरील शेतकरी कुटुंब हवालदिल झाले आहे. तसेच त्याच वेळे दरम्यान कळमसरे रस्त्यावर सुद्धा कापसाचे झाडे छाटल्याने दिवसेंदिवस घटनांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. अशाच प्रकारची घटना मागील आठवड्यात मोड येथील भगवान लोहार यांच्या कळमसरे शिवारात सुद्धा घडल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. त्याबाबत गुन्हा सुद्धा नोंदविण्यात आला आहे. परंतु अद्यापपावेतो माथेफिरूचा तपास लागला नसल्याने पुन्हा-पुन्हा अशाच घटनांचे सत्र वाढतच चालले आहे. अशा दोषींचा वेळेवर शोध लागत नसल्याने, अनेक शेतकरी तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अज्ञात माथेफिरूचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाची मदत घेऊन, दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नर्मदाकाठच्या गावांना औषधांचा वेळेवर पुरवठा करा-मनीषा खत्री

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर, जिल्हा युवा अधिकारी म्हणून अर्जुन मराठे व ललित जाट यांची नियुक्ती

Next Post
नंदुरबार जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर, जिल्हा युवा अधिकारी म्हणून अर्जुन मराठे व ललित जाट यांची नियुक्ती

नंदुरबार जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर, जिल्हा युवा अधिकारी म्हणून अर्जुन मराठे व ललित जाट यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली येथील आर.सी .इंदानी विद्यालयात दहावीत अर्चना राऊळ प्रथम

कोपर्ली येथील आर.सी .इंदानी विद्यालयात दहावीत अर्चना राऊळ प्रथम

May 15, 2025
डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

May 15, 2025
रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव सादर करावेत

रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव सादर करावेत

May 15, 2025
प्रकाशा येथील अल्पवयीन मुलीचा नियोजित बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश

प्रकाशा येथील अल्पवयीन मुलीचा नियोजित बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश

May 15, 2025
१५ मे रोजीचा जनसुरक्षा विधेयक विरोधी जनआक्रोश मोर्चा तुर्त स्थगित

१५ मे रोजीचा जनसुरक्षा विधेयक विरोधी जनआक्रोश मोर्चा तुर्त स्थगित

May 15, 2025
भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात दहावीला आरती पाटील प्रथम

भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात दहावीला आरती पाटील प्रथम

May 14, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group