Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहिर करण्यासाठी नियोजन समितीत ठराव करावा, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

Mahesh Patil by Mahesh Patil
August 14, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहिर करण्यासाठी नियोजन समितीत ठराव करावा, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी
नंदुरबार ! प्रतिनिधी
महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबारचा समावेश आहे . शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करुन सुद्धा पीक न उगवल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे . यामुळे नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहिर करण्यासाठी नियोजन समितीत ठराव करण्यात यावा , अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली असून याबाबत पालकमंत्री अँड.के. सी.पाडवी , जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना निवेदन देण्यात आले आहे .
सदरच्या निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस झाला असून यात नंदुरबारचा देखील समावेश आहे . शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करुन देखील पीक उगवले नाही . यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत . अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पीक पेरणी केली होती . मात्र पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे . महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांचे असल्याने शासनाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत . नंदुरबार जिल्ह्यात असंख्य गावांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळणार नाही , गुरांना जंगलात प्यायला पाणी शिल्लक राहणार नाही , ठराविक काही भागांमध्ये पाऊस पडतो आहे . परंतू जिल्ह्याचा काही भाग हा पावसापासून वंचित आहे . एखाद्या भागात पाऊस पडतो म्हणजे जिल्ह्यात पाऊस झाला असे नाही . पर्जन्यमापक यंत्र हे सर्व प्राथमिक केंद्राच्या भागाप्रमाणे बसविण्यात आले आहे . नंदुरबार जिल्ह्यात भविष्यातील भीषण दुष्काळी संकट पाहता नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करावा व तसा जिल्हा नियोजन समितीमध्ये ठराव करावा , अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निवेदनातून केली आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे स्वीकृत नगरसेवक पदावरून दोघांमध्ये वाद, आ.राजेश पाडवी यांनी घडविला समेट

Next Post

नंदुरबार तालुक्यातील समृद्धगाव स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या उमर्दे खुर्द गावाचा जिल्हाधिकारी यांनी केला सत्कार

Next Post
नंदुरबार तालुक्यातील समृद्धगाव स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या उमर्दे खुर्द गावाचा जिल्हाधिकारी यांनी केला सत्कार

नंदुरबार तालुक्यातील समृद्धगाव स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या उमर्दे खुर्द गावाचा जिल्हाधिकारी यांनी केला सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली येथील आर.सी .इंदानी विद्यालयात दहावीत अर्चना राऊळ प्रथम

कोपर्ली येथील आर.सी .इंदानी विद्यालयात दहावीत अर्चना राऊळ प्रथम

May 15, 2025
डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

May 15, 2025
रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव सादर करावेत

रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव सादर करावेत

May 15, 2025
प्रकाशा येथील अल्पवयीन मुलीचा नियोजित बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश

प्रकाशा येथील अल्पवयीन मुलीचा नियोजित बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश

May 15, 2025
१५ मे रोजीचा जनसुरक्षा विधेयक विरोधी जनआक्रोश मोर्चा तुर्त स्थगित

१५ मे रोजीचा जनसुरक्षा विधेयक विरोधी जनआक्रोश मोर्चा तुर्त स्थगित

May 15, 2025
भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात दहावीला आरती पाटील प्रथम

भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात दहावीला आरती पाटील प्रथम

May 14, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group