नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयाच्या गायत्री वळवी या आदिवासी विद्यार्थीनीने कोरोनाने माता पिता दोघांच्या छत्र हरपल्यानंतर विपरीत परिस्थितीमध्ये दहावीच्या परीक्षेत यश संपादीत केले असून ८४. ४० टक्के गुण मिळविले आहे.
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या थैमानामुळे अनेकांचा संसार उघडयावर पडला.
अनेक परिवार यातून सावरतांना दिसून आहे. यापैकी एक म्हणजेच दहावीचा परीक्षेत यश संपादन करणार्या एकलव्य विद्यालयाची गायत्री वळवी हि विद्यार्थीनी दि.३१ मे २०२१ रोजी तिच्या आईचे कोरोनाने निधन झाले.
यातून कुटूंब सावरत नाही तोच चार दिवसांनी साक्री तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेले वडिलांचे दि.५ जून रोजी छत्र हरपले. अवघ्या आठवडयाभरात गायत्रीचे आई-वडील कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे ती पोरकी झाली.
तिचा मोठा भाऊ व गायत्री यांनी एकमेकांना धीर दिला. अशातच दहावीचे वर्ष असल्याने गायत्रीने स्वतः सावरले. नुकत्याच लागलेल्या निकालात गायत्रीला ८४.४० टक्के गुण मिळाले. सारा विपरीत परिस्थिमुळे तिला तिचे वर्ग शिक्षक असलेले संतोष पाटील धीर देत शिक्षणाकडे परिवर्तीत केले.
मला शिक्षक असलेल्या माझ्या वडीलांचे स्वप्न साकारायचे असल्याने जिद्दीने अभ्यास करून यश संपादीत केल्याचे गायत्री वळवी हिने सांगितले. कोरोनाचा महामारीत आई- वडीलांचे छत्र हरपले असतांना गायत्रीने मिळविलेले यश निश्चित कौतुकास्पद आहे.