नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यात श्रावणी गावात वीज पडल्याने एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पेरणीच्या तोंडावर एक बैल गमावल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
नवापुर तालुक्यातील विसरवाडी व खांडबारा परिसरात आज दि. १९ जून रोजी मान्सूनचा पहिला पाऊस विजांच्या कडकडाटासह २० ते २५ मिनिटे जोरदार बरसला, दरम्यान खांडबारा परिसरातील श्रावणी गावातील समट्या भुऱ्या कोकणी या शेतकऱ्याचा शेतात पळसाच्या झाडाला बांधलेल्या बैलावर वीज पडल्याने बैल जागीच ठार झाला.
तर एक बैल बऱ्याच अंतरावर बांधलेला असल्याने वाचला आहे. खरीप हंगामाच्या पेरणीच्या आधीच वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी समट्या भुऱ्या कोकणी यांनी केली आहे.








