नंदूरबार l प्रतिनिधी
3 एप्रिल रोजी लोकमान्य टर्मिनसहुन दरभंगाकडे जाणारी पवन एक्सप्रेस गाडी अचानक देवळाली कॅम्प जवळ रुळावरून खाली घसरली. त्यामध्ये एका प्रवासाचा दुर्दवी अंत झाला व अनेक प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले. अश्या वेळी खूप भयावह परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यावेळी नंदूरबार तालुक्यातील भालेर येथील मुकेश पाटील हा तरुण सुद्धा जखमी झाला मात्र स्वतःच्या जीवाची कसलीही पर्वा न करता जखमींना गाडीच्या डब्यातून काढुन व्यवस्थित बाहेर काढले . जखमींची संख्या जास्त असल्यामुळे रेल्वेतील जखमींना मदत करण्यास आवाहन मुकेश ने इतर तरुणांना केले. त्यासोबत रेल्वेतील डॉक्टरांच्या सहाय्याने प्राथमिक उपचार देण्याचे प्रयत्न केले. जखमी झालेले काही लोकांना ॲम्बुलन्सच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये देखील पाठवले.
मुकेशने कोरोनाकाळात देखील जळगाव शहरात भरीव काम केले आहे . या कार्याबद्दल त्याचा महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते सत्कार झाला आहे. मुकेश हा नंदुरबार जिल्ह्यातील भालेर गावातील रहिवासी आहे. त्याने पवन एक्सप्रेस मधील जखमींना केलेल्या मदतीबद्दल त्याचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे.