नंदूरबार l प्रतिनिधी
रशिया व युक्रेन यांच्यातील युध्दामुळे जागतीक खत बाजारात खत तुटवडा होण्याची शक्यता असून खताच्या किमती वाढण्याची दाट शक्यता असल्याने नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आवश्यक खते खरेदी करुन ठेवण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नंदुरबार निलेश भागेश्वर यांनी केले आहे.
या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, रशिया व युक्रेन यांचेतील युध्दामुळे जागतीक खत बाजारात खत तुटवडा होण्याची शक्यता असुन , खताच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे . भारत सर्वाधिक खताची आयात करणारा देश असुन युध्दजन्य परिस्थीतीचा देशाला फटका बसण्याची शक्यता आहे . तरी , शेतकरी बांधवांनी सदयस्थितीत बाजारात मुबलक प्रमाणात खत साठा उपलब्ध असुन येणाऱ्या खरीप हंगामासाठी खतांचा जमिन आरोग्य पत्रीका नुसार आवश्यक खत साठा करून ठेवावा . रशिया व युक्रेन युध्दाच्या पार्शभुमिवर ऐन हंगामात खताचा तुटवडा भासणार नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी शक्य असेल तेवढी आवश्यक खते खरेदी करुन ठेवण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नंदुरबार निलेश भागेश्वर यांनी केले आहे.