नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे येथे ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या प्रसारातून १४३ जणांना विषबाधा झाल्याची घटना काल दि. १ मार्च रोजी विषबाधा झालेल्या नागरीकांना आरोग्य विभागाच्या पथकाने तात्काळ त्याचठिकाणी उपचार केल्याने परिस्थिती नियंत्रणात असून सर्व रूग्णांना सोडण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे हे शक्य झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल दि.१ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त राकसवाडे येथे ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. महाप्रसाद वाटपानंतर काही ग्रामस्थांना सायंकाळी उटल्या होवू लागल्या. हळु हळु उलटल्या होणार्यांच्या संख्येत वाढ झाली. यामुळे अनेकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. उलटल्या होणार्या रूग्णांच्या संख्येत प्रसादातून विषबाधा झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आला. राकसवाडा येथे ग्रामस्थांना विषबाधा झाल्याचे समजताच नंदुरबार येथून भाऊसाहेब थोरात, तालुका आरोग्य अधिकारी जाफर तडवी हे प्रथकासह दाखल झाले. त्यांनी लागलीच इतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना माहिती देवून प्राचारन केले. यावेळी गावातील १४३ जणांवर उपचार करण्यात आला. रात्री अडीच वाजेच्या सुमारास शेवटचा रूग्णास उपचार करून सोडण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.जाफर तडवी, डॉ.अजय विचुंरकर, डॉ.उर्वशी वळवी, जितेंद्र सोनानी, डॉ.अमित पटेल, डॉ.मनिष नांद्रे, डॉ.राकेश पाटील, विजय कंणखर, रघुनाथ पाटील, युवराज भटवार, गणेश खेडेकर, एस.टी.वाघ, जि.पी.वाघ, जे.जे. आखाडे, श्रीमती अमृता पाटील, श्रीमती अलका मराठे, श्रीमती महिमा गावीत, निंबा राजपूत आदींच्या आरोग्य पथकाने वेळीच दखल घेतल्याने राकसवाडा येथे मोठा अनर्थ टळला. विषबाधा झालेल्या नागरीकांना तेथेच सोय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल प्रशासनाने आरोग्य विभागाचे अभिनंदन केले. दरम्यान आज अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी राकसवाडा येथे जावून नमुना घेतला.








