Public
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public
No Result
View All Result

पालकमंत्र्यांच्या हस्ते 30 जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण

Mahesh Patil by Mahesh Patil
July 24, 2021
in सामाजिक
0
पालकमंत्र्यांच्या हस्ते 30 जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण

नंदुरबार ! प्रतिनिधी

समाजात वावरतांना सर्व भेद विसरून  माणूस म्हणून जगायला शिकण्याची गरज असून त्यादृष्टीने अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांची मोलाची मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी  यांनी केले.यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते 30 जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
जिल्हा परिषद सभागृहात आयोजित आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांना धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.  कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, नवापूर पंचायत समिती सभापती रतीलाल कोकणी,  अजित नाईक, रुपसिंग पाडवी, कुंदाबाई नाईक, दिलीप नाईक, जिल्हा परीषद समाज कल्याण अधिकारी देवीदास नांदगावकर आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, आंतरजातीय विवाह करणाऱ्या युवक-युवतींनी समाजासमोर आदर्श प्रस्तूत केला आहे. शासनाने सर्वधर्मसमभावाचे तत्व स्विकारले आहे. राज्य घटनेला सर्वोच्चस्थानी मानून समाजात समानता आणि एकता स्थापन करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. भारतीय संस्कृतीत माणूसकीच्या तत्वाला सर्वाधिक महत्व आहे. आंतरजातीय विवाहात माणूस म्हणून एकमेकांचा सन्मान करण्याची भावना असल्याने अशा दाम्पत्यांचे सहजीवन इतरांना प्रेरणा देणारे आणि समाजात जातीय  सलोखा निर्माण करणारे ठरेल, असे त्यांनी सांगितले.
आंतरजातीय विवाहासाठी कुटुंबियांचे सामंजस्याने मतपरिवर्तन करणे किंवा घरातून विरोध असतानाही लग्नानंतर आई-वडिलांचा सन्मान करून त्यांच्याकडे लक्ष देणे या दोन्ही गोष्टी कौतुकास्पद असल्याचे  पालकमंत्री म्हणाले. त्यांनी विवाहीत दाम्पत्यांना सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
श्रीमती वळवी म्हणाल्या, आंतरजातीय विवाहामुळे जातीय सलोखा निर्माण होण्यास मदत होईल. देशात एकात्मता स्थापन करण्यासाठी अशा विवाहांना प्रोत्साहन देणारी ही चांगली योजना आहे. माणूस म्हणून जोडीदाराला स्विकारणे महत्वाचे आहे.
श्री.गावडे म्हणाले, आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांनी मुलगा किंवा मुलगी असा भेद न मानता एक किंवा दोन अपत्यानंतर कुटुंब नियेाजन शस्त्रक्रीया करावी. मुलासारखेच मुलीलाही चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे. आंतरजातीय विवाहामुळे समाज सुदृढ होईल आणि जातीभेद नष्ट होण्यास मदत होईल.
प्रास्ताविकात श्री.नांदगावकर यांनी योजनेविषयी माहिती दिली. यावेळी आंतरजातीय विवाह केलेल्या तीन दाम्पत्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते 30 जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

विखरण विद्यालयात दहावीच्या परीक्षेत पुनम साळुंके प्रथम

Next Post
विखरण विद्यालयात दहावीच्या परीक्षेत पुनम साळुंके प्रथम

विखरण विद्यालयात दहावीच्या परीक्षेत पुनम साळुंके प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम

राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम

July 3, 2022
सार्वजनिक जागी वाढदिवस साजरा करणे पडले महागात, ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सार्वजनिक जागी वाढदिवस साजरा करणे पडले महागात, ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2022
पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2022
तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील चार विद्यार्थी घेतले दत्तक

तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील चार विद्यार्थी घेतले दत्तक

July 3, 2022
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेश वसावे यांचा गौरव

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेश वसावे यांचा गौरव

July 3, 2022
मानमोड्या शिवारात वनजमीनीवर रात्री नांगरटी करणाऱ्या चौघांना अटक, सात लाखाचा मुद्देमाल जप्त

मानमोड्या शिवारात वनजमीनीवर रात्री नांगरटी करणाऱ्या चौघांना अटक, सात लाखाचा मुद्देमाल जप्त

July 2, 2022

एकूण वाचक

  • 1,691,447 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group