नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील ३२ परीक्षा केंद्रांवरे आज झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत ११ हजार ५२ परीक्षार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होते.दरम्यान पहिल्या पेपरला ६८७ परीक्षार्थी तर दुसर्या पेपरला ४७८ परीक्षार्थी असे एकुन १ हजार १६५ परीक्षार्थी अनुपस्थित होते.
नंदुरबार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ ( MAHATET – २०२१ ) चे आयोजन आज रविवार रोजी करण्यात आले होते . नंदुरबार शहरातील ३२ परीक्षा केंद्रांवर एकूण ११ हजार ५२ परीक्षार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होणार होते . परीक्षा आयोजनासाठी गठित जिल्हा संनियंत्रण समितीच्या प्रमुख जिल्हाधिकारी मनिषा खत्री तसेच सहप्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . राहुल चौधरी तसेच उपशिक्षणाधिकारी डॉ . युनूस पठाण यांनी केले . सकाळ सत्र व दुपार सत्र अशा दोन सत्रात परीक्षेचे आयोजन करण्यात येऊन पेपर क्र १ ला १९ परीक्षा केंद्रांवर ६ हजार ९१ परीक्षार्थीपैकी एकूण ५ हजार ४०४ परीक्षार्थी उपस्थित राहिले असून ६८७ परीक्षार्थी अनुपस्थित होते . पेपर क्रमांक १ ला ८८.७२ टक्के परीक्षार्थ्यांनी उपस्थिती दिली आहे . पेपर क्र २ ला १३ परीक्षा केंद्रांवर ४ हजार ९६१ परीक्षार्थीपैकी एकूण ४ हजार ४८३ परीक्षार्थी उपस्थित राहिले असून ४७८ परीक्षार्थी अनुपस्थित होते . पेपर क्रमांक २ ला ९०.३६ टक्के परीक्षार्थ्यांनी उपस्थिती दिली आहे . प्राचार्य डायट डॉ . जगराम भटकर तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . राहुल चौधरी यांनी भरारी पथकाची जबाबदारी पार पाडली असून गटशिक्षणाधिकारी आर . आर . देसले , शेखर धनगर , धनराज राजपूत , आर . बी . चौरे , भावेश सोनवणे यांनी झोनल अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे . जिल्हा परिरक्षक म्हणून सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक आर.बी. पाटील यांनी कामकाज पार पाडले . परीक्षा केंद्रांवरील कामकाजाचे संनियंत्रण करण्यासाठी विस्तार अधिकारी शिक्षण आणि केंद्रप्रमुख यांना सहाय्यक परिरक्षक म्हणून नेमणूक देण्यात आली होती . जिल्हा नियंत्रण कक्षाचे प्रमुख म्हणून उपशिक्षणाधिकारी डॉ . युनूस पठाण कामकाज पार पाडले असून परीक्षा समितीचे सहनियंत्रक म्हणून त्यांना नेमणूक देण्यात आली होती . परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस प्रशासनाने चोखपणे पार पाडले आहे . परीक्षेच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक शिक्षण विभागाचे एस . एन . पाटील , एम . आर . निकुंभ , पी . के . पवार , आसिफ पठाण , इसरार सैय्यद , सुनिल गिरी , महेंद्र अहिरे , योगेश रघुवंशी , मयुर वाणी व रविंद्र बच्छाव यांनी परिश्रम घेतले .










