अक्कलकुवा l प्रतिनिधी
स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार यांच्या निर्देशनाप्रमाणे पॅन इंडीया योजने अंतर्गत दि.२ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान देशभरात कायद्याची माहिती व्हावी. यासाठी या शिबिराचे आयोजन आले होते .त्याअनुषंगाने अक्कलकुवा तालुका विधीसेवा समितीच्या वतीने विधीसेवा सप्ताह निमित्ताने आमलीबारी चौफुली ते बाजारातुन कालिका माता मंदिर परिसर पर्यंत कायदेविषयक प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी विधीसेवा सप्ताहाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक नरेंद्र पाडवी यांच्या हस्ते प्रभातफेरीचे उद्घाटन करण्यात आली. सदर प्रभातफेरी ही बाजारपेठेतुन कालिका माता मंदिर परिसरात सांगता करण्यात आली. विधी सेवा सप्ताह समोरोप कार्यक्रमात बोलताना न्यायाधीश व्ही. पी.शिंदे म्हणाले की,
भारतातील प्रत्येक नागरिकाला कायद्याची तोंडओळख असणे आवश्यक आहे. कायद्याची तोंडओळख नसल्यास आपले अधिकार कळणार नाही म्हणून स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी सुध्दा गावोगावी कायद्याची तोंडओळख नसल्यामुळे त्याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आजादीच्या अमृत महोत्सव आणि विधी सेवा सप्ताहानिमित्त न्यायाधीश वर्ग खेडोपाडी जावून कायदेशीर शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करत आहे. या विधि सेवा सप्ताहात प्रत्येक नागरिकांमध्ये कायदेविषयक जानजागृती निर्माण होण्यास मदत होते, असे प्रतिपादन न्यायाधीश व्ही.पी.शिंदे यांनी केले. पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी वाहतूक नियम पाळण्याची ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असे मनोगत व्यक्त करतांना सांगितले,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र पाडवी हे होते, या कार्यक्रमास सरकारी वकील ॲड.एम.आय,मन्सूरी , ॲड.आर.आर.मराठे,ॲड. राजेंद्र जैन, ॲड.रुपसिंग टी. वसावे,ॲड.आर.टी. वसावे, ॲड.डी.डी.पाडवी , ॲड.गजमल वसावे, ॲड.कैलास वसावे,ॲड.जितेंद्र वसावे,ॲड. फुलसिंग वळवी, ॲड. सुरेश वसावे, ॲड.जे.के.राऊत ,ॲड.जे.टी. तडवी, ॲड.गौरी पाटील, ॲड. व्ही.एस.वळवी,ॲड. जी.जी.वसावे,ॲड.पी.व्ही.ठोंबरे, ॲड. येशु वसावे,डॉ.योगेश कुलकर्णी, राजेश्वरसिंग पाडवी,प्रा.दिनेश खरात,प्रास्तविक ॲड.पी.आर.ठाकरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मनोज मुधोळकर यांनी केले तर आभार ॲड.संग्राम पाडवी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अक्कलकुवा न्यायालयाचे सहा.अधिक्षक विनायक एस.पाडवी , श्रीमती.जे.टी.वळवी ,एस.के अहिरे,योगेश साळुंखे एस.टी.पाटील,संतोष ठाकूर व सी.ए.ठाकरे मनोज लोहार,ईश्वर वसावे, यांनी परिश्रम घेतले. सदर प्रभातफेरी त लायन्स क्लब, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचे विद्यार्थी व आदर्श विद्यालय सह विविध संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी शिक्षक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.










