नंदुरबार l प्रतिनिधी-
‘जनम जनम का नाता है गौ हमारी माता है’, ‘गौमतेला राष्ट्रमाता घोषित करा’ अश्या घोषणांचा गजरात शेकडो गौभक्त यांच्या उपस्थितीत भव्य गौसन्मान रॅलीमध्ये सहभागी झाले. रॅली दादावाडी जैन मंदिरापासून सुरू होऊन गिरीविहार गेट ते तहसील कार्यालयात समारोप करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत हजारो स्वाक्षरींचे निवेदन संत, महंत, कथाकार यांनी दिले.यावेळी गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबा सहभागी झाल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
रॅलीचे सुरुवात गौमाता आणि नंदीबाबा तसेच गौसन्मान प्रार्थना पत्रांचे विधिवत पूजन करुन करण्यात आले. पिठाधीश पू. उध्दव महाराज, भागवताचार्य अविनाश महाराज जोशी, प्रकाशपुरी महाराज, वसंत चैतन्य महाराज, अनिल महाराज, गौभक्त डॉ नरेंद्र पाटील यांनी पूजन केले. वेदमंत्र पठन प्रमोद जोशी महाराज यांनी केले. हजारो स्वाक्षरींचे निवेदन ऐका लाल कापडमध्ये ठेऊन घोडा बग्गीवर रॅलीत सहभागी करण्यात आले.
रॅलीत प्रधानस्थानी गौमाता, नंदी बाबा, संत, महंत, कथाकार यांचे मागे मातृशक्ती व शेकडो गौभक्त सहभागी झाले होते. रॅलीत नवापूर येथील आदिवासी भजनी मंडळाने गौमतेचे भजन गायिले. जनम जनम का नाता है गौ हमारी माता है, बंद करो बंद गौहत्या बंद करो, गॊमाता को राष्ट्र माता घोषित करो, लाना होगा लाना होगा गौहत्या बंदी कानून लाना होंगा अश्या घोषणा देण्यात आल्या. रॅलीचा समारोप तहसील कार्यालयात झाल्यावर पू उद्धव महाराज, भागवताचार्य अविनाश महाराज यांनी उपस्थित गौभक्त यांना गौमाता राष्ट्र माता करण्यासाठी काय प्रयत्न करावे याविषयी संबोधित केले.
प्रशासनाचा वतीने नंदुरबार तहसीलदार प्रदीप पवार यांनी सर्व गौभक्तांचा भावनांचा आदर राखत स्वतः कार्यालयाचा बाहेर येऊन सर्व गौभक्त संत, महंत आणि शेकडो गौभक्त यांच्या हस्ते निवेदन स्वीकारले . यावेळी डॉ नरेंद्र पाटील यांनी निवेदनातील मागण्या संदर्भात प्रशासनाला अवगत केले. भारतातील ५५०० तालुक्यात २७ एप्रिल रोजी गौसन्मान रॅलीचे आयोजन केले आहे.निवेदनात गौमाता राष्ट्र माता घोषित करणे, केंद्रीय गोसेवा आणि संरक्षण कायदा’ लागू करून देशातील सर्व कत्तलखान्यांचे परवाने रद्द करावे, स्वतंत्र केंद्रीय गौ मंत्रालय स्थापन करावे या मागण्या करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यावेळी नंदुरबार तालुक्यातील संत, महंत, गौरक्षक, गौभक्त यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक रॅलीत सहभागी झाले होते.








