नवविवाहित युवकाचा खुनाची सीबीआय चौकशी व्हावी; रघुवंशी समाजाचे निवेदन
नंदुरबार l प्रतिनिधी
इंदूर येथील नवविवाहित युवकाचा हत्येचा अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय महापरिषदेचा वतीने निषेध करण्यात आला असून, त्यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करून प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत रघुवंशी समाजाच्या शिष्टमंडळाने आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना निवेदन दिले आहे. २२ मे ते २३ मे २०२५ रोजी इंदूर येथील नवविवाहित राजा रघुवंशी आणि त्यांच्या पत्नी श्रीमती सोनम रघुवंशी यांचे शिलॉंग (मेघालय)येथून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अपहरण केले होते. त्यानंतर नवविवाहित राजा रघुवंशी यांची हत्या करण्यात आली. घटनेनंतर सोनम रघुवंशी यांचे अपहरण करण्यात आले.त्यांच्या अजून पर्यंत थांगपत्ता लागलेला नसून, जीवाला धोका निर्माण झाला आहे. जवळच बांगलादेश सीमा असल्यामुळे मानवी तस्करीची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
अपहरण झालेल्या सोनम रघुवंशी यांच्या शोधार्थ त्यांचे भाऊ दीपक रघुवंशी सहकाऱ्यांसह शिलॉंग येथे गेले आहेत त्यांना देखील गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून धमक्या देण्यात आल्या. या घटनेमुळे रघुवंशी समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
निवेदनातील मागण्या
नवविवाहित युवक राजा रघुवंशी यांच्या हत्येची तात्काळ सीबीआय चौकश करावी. मारेकऱ्यांना अटक व्हावी. श्रीमती सोनम रघुवंशी यांच्या सुरक्षित परतीसाठी त्वरित आणि प्रभावी शोध सुरू करावा. सोनम रघुवंशी यांच्या शोधात सहभागी असलेल्या त्यांच्या भाऊ दीपक रघुवंशी व सहकाऱ्यांना पुरेशी सुरक्षा पुरवावी.
यांची होती उपस्थिती
निवेदन देण्याप्रसंगी आ.चंद्रकांत रघुवंशी,किशोर रघुवंशी, विलास रघुवंशी,निखिल रघुवंशी,रवींद्र परदेशी,पुष्पेन्द्र रघुवंशी,संदीप रघुवंशी,आनंद रघुवंशी,इंग्रजीत रघुवंशी,महेश रघुवंशी,दिनेश परदेशी,महेश परदेशी,गजेंद्र रघुवंशी,सागर रघुवंशी,सुनील रघुवंशी,विनोद रघुवंशी,महेंद्र रघुवंशी,संतोष परदेशी,संतोष परदेशी,सुनील रघुवंशी,शैलेंद्र रघुवंशी आदी उपस्थित होते.