Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बलशाली भारतासाठी श्रमसंस्कार शिबिर महत्त्वाचे : डॉ. महाविरसिंग चव्हाण

team by team
December 22, 2024
in शैक्षणिक
0
बलशाली भारतासाठी श्रमसंस्कार शिबिर महत्त्वाचे : डॉ. महाविरसिंग चव्हाण

नंदुरबार l प्रतिनिधी

रासेयो शिबिराच्या माध्यमातून सामाजिक सेवा जोपासतानाच मानसिक स्वास्थ्य सुद्धा जोपासले जाते. महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर गावाचा विकास करावा असे प्रतिपादन म.फु.कृ.वि. चे रासेयो, संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चव्हाण हे टोकर तलाव येथील राष्ट्रीय सेवा योजने च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, नंदुरबार च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे युथ फॉर माय भारत आणि डिजिटल साक्षरतेसाठी युवक या संकल्पनेवर आधारित सात दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दिनांक १८ ते २४ डिसेंबर या कालावधीत टोकरतलाव ता. जि. नंदुरबार येथे करण्यात आले आहे.

शिबिराचे उद्घाटन म.फु.कृ.वि. चे रासेयो, संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता, डॉ. यु. बी. होले होते. कार्यक्रमास टोकरतलावच्या सरपंच सौ. जयमाला गावित, पोलीस पाटील अमृत वसावे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील, व सर्व शिक्षक, तसेच सहाय्यक प्रा. डॉ. एस. एस. वाघ, विद्यार्थी स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन आणि विद्यापीठ गीत व रासेयो गीताने करण्यात आली.
डॉ. चव्हाण यांनी कॉलेज- नॉलेज- व्हिलेज ही संकल्पना स्वयंसेवकांच्या मनात रुजवली व आपल्या स्वरचित कविता च्या माध्यमातून उपस्थितांची मनी जिंकली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. डॉ. यु. बी. होले, म्हणाले की शिबिराच्या माध्यमातून झालेले संस्कार आयुष्य घडवण्यास मदत करतात. व शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

राष्ट्रीय शिबिराच्या आयोजनाबद्दल गावाच्या सरपंच सौ. जयमाला गावित यांनी आनंद व्यक्त केला व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. एस. जी. राजपूत यांनी केले. तर सूत्रसंचालन कु. सेजल पवार व चि. पृथ्वीक पाडवी यांनी केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. पी. खोंडे, कृषि सहाय्यक श्रीमती ए. जे. गायकवाड, संदीप नेरकर व सुरेंद्र गवळी मेहनत घेत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तीन जिल्ह्यातून चोरी केलेल्या 14 मोटरसायकली स्थानिक गुन्हे शाखेकडुन हस्तगत , तिघांना अटक, एक फरार

Next Post

परभणी येथील घटनेचा निषेध करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

Next Post
परभणी येथील घटनेचा निषेध करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

परभणी येथील घटनेचा निषेध करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add