नंदुरबार l प्रतिनिधी-
तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तापी नदी कॅचमेंट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हतनूर धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या स्थितीत हतनूर धरणाचे १६ गेट १.५ मीटरने उघडले असुन ७०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरु आहे. तसेच आज रोजी सकळी ९.०० वाजता १८ गेट १.५ मीटरने उघडण्यात येणार असुन ८०००० ते १००००० क्युसेक पाण्यााचा विसर्ग तापी नदी पात्रात हतनुर धरणाातुन सोडण्यात येणार आहे.
सध्या स्थितीत सारंगखेडा व प्रकाशा बरेज मध्ये ४८००० क्युसेक पाण्यााचा येवा सुरु असुन सांरगखेडा बॅरजचे ४ गेट ३ मिटरने उघडले असुन ४५७६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे व प्रकाशा बॅरेजचे ५ गेट ३ मीटरने उघडले असुन ५०३५९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाण्याची आवक लक्षात घेता पुढील काही तासात सांरगखेडा व प्रकाशा बॅरेजचा विसर्ग वाढवण्यात येईल.
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असल्यामुळे तापी नदी काठावरील गांवाना याव्दारे सतर्कतेचा इशारा देण्याात येत आहे. तापी नदीकाठावरील नागरीकांनी आपले गुरे व प्राणी नदी काठावर सोडू नये तसेच पाण्यााचे पंप सुरक्षित स्थळी ठेवावे. नागरीकांनी तापी नदी काठाजवळ जावू नये असे आवाहन याव्दारे करण्यात येत आहे. याबाबत स्थानीक वृत्तपत्र, दुरचित्रवाहीनी, सामाजिक मीडीया गृप च्या माध्यमातून तापी नदीकाठावरील गावातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी हरिष भामरे यांनी दिला.