नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील भारतीय जनता पार्टीतर्फे नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशींना टोल माफी मिळावी या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हयातील राज्य मार्ग क्र. नंदुरबार – शहादा दरम्यान डामरखेडा जवळ नवीन टोल येऊ घातलेल्या आहे. त्यानुसार लवकरच टोल आकारणी सुरु होणार आहे. तरी नंदुरबार जिल्हयाचे स्थानिक रहिवाशी यांना टोल आकारणी करण्यात येऊ नये. कारण स्थानिक शेकडो वाहने शेती, व्यापार, व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने दैनंदिन ये जा करतात. नंदुरबार जिल्यात सर्वाधिक वर्दळ नंदुरबार शहादा. दरम्यान होत असते. लहान व्यवसायिक, नोकरदार, शेतकरी यांना दिवसभरातून कामाच्या निमित्ताने अनेक फे-या कराव्या लागतात.
महाराष्ट्र शासनाने ब-याचे ठिकाणी स्थानिक वाहनांना टोलमुक्त केलेले आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हयातील रहिवाश्यांना टोल मुक्ती मिळावी ही मागणी करण्यात आली.या निवेदनावर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, वसंत पाटील, भाजपा शिक्षक आघाडी , उपाध्यक्ष विजय वळवी, आदिवासी मोर्चा सचिव आसाराम नाईक, राजू प्रधान, मनोज सूर्यवंशी यांच्या सह्या आहेत.
सदर निवेदनाची प्रत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविण्यात आली आहे.