Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात १३०० रस्त्यांच्या माध्यमातून वाडे, वस्त्या, पाडे जोडले जाणार : डॉ.विजयकुमार गावित

Mahesh Patil by Mahesh Patil
August 21, 2023
in राजकीय
0
जिल्ह्यात १३०० रस्त्यांच्या माध्यमातून वाडे, वस्त्या, पाडे जोडले जाणार : डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

सततच्या पाठपुराव्यानंतर जिल्ह्यातील भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात तब्बल १३०० रस्त्यांच्या माध्यमातून वाडे, वस्त्या, पाडे जोडले जाणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील १२ लाख आदिवासींना दिलासा मिळणार आहे. सदर योजने अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात १ हजार ६७२ कोटी रुपये खर्च असल्याचा अंदाज राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला आहे. नंदुरबार येथे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

 

नंदुरबार जिल्ह्यात मुख्यत्वे करुन धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात रस्त्यांची समस्या बिकट आहे. यामुळे तेथील रहिवाशांना सेवा देतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी शासनाच्या योजनांची देखील प्रभावी अंमलबजावणी होत नाही. यामुळे या भागातील वाडे, वस्त्या, पाडे, गाव, सेवा देणाऱ्या शासकीय इमारती रस्त्यांनी जोडण्याचा मानस होता.त्यानुसार पाठपुरावा केला. राज्य शासनाने याची दखल घेत भगवान बिरसा मुंडा योजना नुकतीच जाहीर केली आहे. यास मंत्री मंडळाने मंजूरी देखील दिली आहे. सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील १७ जिल्ह्यातील आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यात येणार आहेत. हा प्रकल्प सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा असणार आहे. एकंदरीत राज्यात ६ हजार ८३८ कि.मी. लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहे. याचा फायदा राज्यातील १२ लाख आदिवासींना होणार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व आदिवासी पाडे रस्त्याने जोडण्यासाठी नवीन भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, या रस्त्यांसाठी आदिवासी विकास विभागाची स्वतंत्र समिती असणार आहे, असे मंत्री डॉ.गावित म्हणाले.

 

 

सदर रस्त्यांच्या कामाला डिसेंबरच्या अर्थसंकल्पात मंजूरी मिळणार आहे. मंजूरी नंतर लगेच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. यादरम्यान, वन विभागात ३:२ चे प्रस्ताव आल्यास त्वरीत मंजूरी देण्यात येणार आहे. नॉन प्लॅन रस्त्यांचा देखील यात समावेश असणार आहे. तसेच खासगी जमिनी अधिग्रहण करण्यासाठी देखील मंजूरी देण्यात येणार आहे. यामुळे सदर कामांच्या मंजूरी नंतर साधारण तीन वर्षांच्या कालावधी रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सदर कामांची देखरेख होणार असल्याचे डॉ.गावित म्हणाले.

 

भगवान बिरसा मुंडा रस्ते जोड योजने अंतर्गत सर्व आदिवासी वाडे, पाडे यांना बारमाही मुख्य रस्त्यांशी जोडणे, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व आठमाही रस्ते बारमाही करणे आणि आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आश्रमशाळांना मुख्य रस्त्यांशी जोडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या योजनेमुळे आदिवासी जनतेस मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून अडचणी दूर होणार आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी बांधवांच्या कृषिपुरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘जो जे वांछील ते तो लाहो’ प्रमाणे धोरण : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली कारवाई रद्द, रस्त्याबाबत खंडपीठाचे ताशेरे

Next Post
सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली कारवाई रद्द, रस्त्याबाबत खंडपीठाचे ताशेरे

सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली कारवाई रद्द, रस्त्याबाबत खंडपीठाचे ताशेरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group