जागतिक मुळनिवासी दिनानिमत्ताने देवमोगरा सभागृह नंदुरबार येथे जिल्ह्यातील सत्यशोधक शेतकरी सभा, आदिवासी मौखिक साहित्य परिषद, आदिवासी एकता परिषद, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, फुले आंबेडकर स्टडी सर्कल, विद्रोही सांस्कृतिक चवळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वंचित बहुजन आघाडी, बामसेफ या सर्व समतावादी संघटनांच्या वतीने देशातील आदिवासींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमागील नियोजित षडयंत्र या विषयांवर विख्यात समतावादी विचारवंत *डॉ* *राम पूनीयानी* यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
नंदुरबार l प्रतिनिधी
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, ग्रामीण कष्टकरी सभेचे किशोर ढमाले, एकता परिषदेचे चंद्रसिंग बर्डे, ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, आदिवासी मौखिक साहित्य परिषदेचे भिमसींग वळवी, संजय मोहिते, अरुण रामराजे, रंजना कान्हेरे, रामसिंग गावित, करनसिंग कोकणी, रेखाताई पाडवी, विक्रम गावित, यशवंत मालचे, रणजित गावित, सदानंद गावित, अरविंद वळवी, कृष्णा गावित, दादाभाई पिंपळे, चूनीलाल ब्राह्मणे उपस्थित होते.
आदिवासी जागतिक स्तरावर मूळनिवासी दिवस साजरा करत असताना भारतातील आदिवासींना त्यांच्या मूळ संस्कृती व जमिनीपासून बेदखल करण्याचे षडयंत्र मनुवादी व्यवस्थेतकडून केले जात आहे. मणिपूर राज्यातील आदिवासींवर होणारे अत्याचार फक्त प्रयोग असून देशातील सर्वच पर्वतीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या आदिवासींवर ही वेळ येणार असून त्याची झाड संपूर्ण समाजवादी समाजावर होणार आहे. त्यामुळे संविधान आणि सामाजिक नेतेमूल्य वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची वेळ असल्याचे मत प्रसिद्ध समतावादी विचारवंत डॉ राम पूनियनी यांनी व्यक्त केले. तसेच
आदिवासींची आदिम सभ्यता टिकवायची असेल तर भारतीय संविधान वाचले पाहिजे कारण आज केंद्र सरकार अनेक आदिवासींच्या महत्त्वाच्या कायद्यात बदल करत असून काही दिवसांनी संपूर्ण राज्यघटनाच बदलण्याचा डाव सरकारच्या असल्याचे मत डॉ राम पूनियनी यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकार आज भारतीय राज्यघटना बदलण्याचा तयारीत आहे त्यामुळे आपले लक्ष विचलित करण्यासाठी देशात सांप्रदायिक व जातीय दंगली सरकारकडून घडवून आणत आहे. देशातील आदिवासींकडे असलेल्या भूभाग भांडवलदारांना देण्यासाठीच वेगवेगळे कायदे संसदेत पारित करण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचे मत खालील मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, ग्रामीण कष्टकरी सभेचे किशोर ढमाले, एकता परिषदेचे चंद्रसिंग बर्डे, ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, संजय मोहिते, रंजना कान्हेरे, रामसिंग गावित, करनसिंग कोकणी, रेखाताई पाडवी, यशवंत मालचे, रणजित गावित, दादाभाई पिंपळे, चूनीलाल ब्राह्मणे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. विक्रम गावित यांनी आभार मानले.