अक्कलकुवा l प्रतिनिधी
वृक्ष संवर्धन ही काळाची गरज झाली असुन वृक्ष संवर्धनासाठी समाज मनाची मानसिकता महत्वाची आहे.स्वतः लावलेल्या झाडाची सावली आपल्या पुढील पिढीला मिळेल त्यामुळे आशावादी राहुन प्रत्येकाने किमान एक झाड जगवण्याचा संकल्प करावा असे प्रतिपादन आमदार आमश्या पाडवी यांनी केले.
नंदुरबार जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्ष पुर्तीच्या म निमित्ताने अक्कलकुवा येथील पंचायत समिती कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थाना वरुन आमदार आमश्या पाडवी बोलत होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, पंचायत समिती सदस्य सुधीर पाडवी तालुका शेतकरी सह संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी, सहा.गट विकास अधिकारी वाय.डी.पवार, गट शिक्षण अधिकारी मंगेश निकुंभ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुकाराम वळवी, माजी सरपंच छोटु पाडवी आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यानंतर पंचायत समितीच्या आवारात आमदार आमश्या पाडवी व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी आरती शिंपी, प्राचार्या डॉ.संध्या पटेल, मुख्याध्यापिका रत्नमाला माळी आदींसह अक्कलकुवा पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी, माध्यमिक व प्राथमिक शिक्षक उपस्थित होते.









