नंदूरबार l प्रतिनिधी
अभिनेता अजय देवगण यांना जंगली रमी जाहिरात बद्दल आपण ज्या जंगली रम्मी ऑनलाईन गेमची जाहिरात करता तेच जंगली रम्मी ऑनलाईन गेम खेळून तुम्ही आजपर्यंत किती पैसे जिंकलेले आहे. व जाहीरातीचा उद्देश काय आहे.असा सवाल करीत याबाबत नांदेड जिह्यातील एकाने पत्र अजय देवगण यांना पाठविले असून ते सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, महोदय अभिनेता अजय देवगन स. नमस्कार व राम राम आपण एक अतिशय उत्तम अभिनेता आहात. आपले अनुकरण करणारे महाराष्ट्रात अनेक लाखो नवतरुण आहेत. हे तुमच्यासाठी अभिमानाची व तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे. आज काल सोशल मीडियाचा खुप सारे नवतरुण उपयोग करत आहेत. नवतरुणांना चांगली दिशा देण्याचे काम आपल्यासारख्या अभिनेत्यांने सोशल मीडियावर केले पाहिजे. पण सोशल मीडियावर आपली जंगली रम्मी या ऑनलाईन गेमची जाहीरात पाहून अनेक नवतरुणांना या गेम खेळण्याची जनु सवयच लागली.
व याच सवयीमुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत? त्यामुळे अनेक तरुणांना प्रश्न पडला आहे की आपण जंगली रम्मी हा ऑनलाईन गेम खेळून आजपर्यंत किती पैसे जिंकलेले आहे. व जाहीरातीचा उद्देश काय आहे हे महाराष्ट्रातील तरुणांना सांगितले पाहिजे. व नवतरुणांना जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून हे सर्व आपण सांगितले पाहिजे. जर स्थाच गेमला काही राज्यात बंदी आहे. आपण मात्र बिंदास्त जाहिरात करता. महाराष्ट्रातील तरुणांना हा जंगली रम्मी गेम किती फायद्याचा आहे.
हे पण आपण सांगितले पाहिजे. आणी हाच गेम तुमच्या आजुबाचे किती मान्यवर खेळतात हे पण आपण पाहीले पाहिजे. कारण ग्रामीण भागातील नवतरुणांना चांगल्या गोष्टीचे मार्गदर्शन करणारे खूप कमी लोक आहेत. त्यातच तुम्ही असे जाहीराती करून नवतरुणांना काय संदेश देत आहोत हे पण सांगितले पाहिजे. फक्त जाहिरात करून पैसेच कमविण्याचा उद्देश असेल तर हाच उद्देश किती योग्य आहे. या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा व आपण ही जाहीरात बंद करावी व नवतरुणांना चांगले विचार देण्याचा प्रयत्न करावे अशा आशयाचे पत्र विलास प्रतापराव शिंदे मु.पो.वसूर ता.मुखेड जि.नांदेड यांनी अभिनेत्याला पाठवले असून हे पात्र सोशल मिडियात व्हायरल झाले आहे.








