Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आता मनरेगा मस्टरवरील ग्रामसेवकांची स्वाक्षरी झाली बंद

team by team
January 29, 2023
in राज्य
0
आता मनरेगा मस्टरवरील ग्रामसेवकांची स्वाक्षरी झाली बंद
नंदुरबार | प्रतिनिधी
मनरेगा मस्टरवरील ग्रामसेवकांची स्वाक्षरी बंद करण्याचा शासन निर्णय पारीत करण्यात आला असुन  महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या मागणीला यश आले आहे.यापुढे  हजेरीपटावरील मजूरांची उपस्थिती ग्रामरोजगार सेवक नोंदवू शकेल व याबाबत पडताळणी करून हजेरी पटावरील मजूरांची उपस्थिती ग्रामरोजगार सेवकांना अधिकार देण्यात आले असल्याचा आदेश पारीत करण्यात आला असुन यावर अपर मुख्य सचिव (रोहयो) नंद कुमार यांची स्वाक्षरी आहे.
या आदेशात म्हटले आहे की,शासन निर्णय दि. २७ मे, २०११ नुसार मनरेगाची विविध कामे करण्यासंदर्भात इतर यंत्रणांची भूमिका व जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. सदर शासन निर्णयातील परिशिष्ट अ मधील अनुक्रमांक ९ व १० नुसार कामाच्या ठिकाणी मजुरांना सोयी सुविधा पुरविणे व मजुरांची दैनंदिन हजेरी घेणे व इतर नोंदी घेणे इत्यादी कामे करण्यासंदर्भात जबाबदारी संबंधित यंत्रणातील क्षेत्रिय तांत्रिक संवर्ग व संबंधित ग्रामसेवक यांच्यावर असुन या कामात संबंधित ग्रामसेवक यांनी मदत करणे व मजुरांची उपस्थिती ग्राम रोजगार सेवक यांनी नोंदविल्यावर त्याची खात्री,पडताळणी संबंधित यंत्रणेचे तांत्रिक संवर्ग, ग्रामसेवक करतील अशी तरतुद होती.
दरम्यान ग्रामसेवक संघटनेने त्यांच्या निवेदनाद्वारे ग्रामसेवकांना विविध कामे करावी लागतात. त्यात निवडणुक आयोगाची कामे, कृषि विभागाची कामे, सामाजिक न्याय विभागाची कामे या सर्व कामांमुळे ग्रामसेवकावर अतिरिक्त ताण व मानसिक तणावामुळे मनरेगा सारख्या अत्यंत व्यापक योजनेस ग्रामसेवक न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून वेळोवेळी शासनास येत होती. दि.३० नोव्हेबर २०२२ रोजी याबाबतमंत्री (रोहयो) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ग्रामसेवक संघटनेची मागणी विचारात घेवून यात बदल करण्यात आला असुन शासनाने शासन निर्णय २७ मे, २०११ मध्ये सुधारणा करुन सदर शासन निर्णयात बदल केला असुन यापुढे  हजेरीपटावरील मजूरांची उपस्थिती ग्रामरोजगार सेवक नोंदवू शकेल व याबाबत पडताळणी करून हजेरी पटावरील मजूरांची उपस्थिती ग्रामरोजगार सेवकांना अधिकार देण्यात आले असल्याचा आदेश पारीत करण्यात आला असुन यावर अपर मुख्य सचिव (रोहयो) नंद कुमार यांची स्वाक्षरी आहे.यामुळे आता स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित झाली असुन ग्रामरोजगार सेवकांना अधिकार देण्यात आले आहेत.
       नरेगा यंत्रणा स्वतंत्र करणे साठी बर्‍याच दिवसापासून मागणी लावून धरलेल्या संघटनेचे मागणीला पहिले पाउल टाकत नरेगा मस्टरवरील स्वाक्षरी बंद करत यश संपादन केले आहे.त्यामुळे ग्रामसेवकांवरीत कामाचा ताण काही प्रमाणात कमी होणार आहे.-
संजीव निकम
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना,राज्याध्यक्ष
बातमी शेअर करा
Previous Post

रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, खा.डॉ.हिना गावीत यांना दिले निवेदन

Next Post

श्रॉफ हायस्कूलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा 

Next Post
श्रॉफ हायस्कूलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा 

श्रॉफ हायस्कूलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add