मुंबई |
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागांसाठी भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.यात शिंदे गटाकडून मा.आ.
चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव आघाडीवर आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी मविआ सरकारने पाठवलेली यादी रद्द करून ती नव्याने पाठवण्याची घोषणा केली होती.
या १२ जागांमधील ८ जागा भाजपला तर ४ जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी अनेकजण इच्छुक आहेत. यात भाजपच्या वाट्याला ८ जागा येण्याची शक्यता आहे. या आठ जागांसाठी भाजपकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पंकजा मुंडे, चित्रा वाघ, कृपाशंकर सिंह, गणेश हाके, सुधाकर भालेराव यांच्या नावांची चर्चा आहे.
तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वाट्याला १२ जागांपैकी ४ जागा येण्याची शक्यता आहे. या चार जागांसाठी शिंदे गटातील माजी मंत्री रामदास कदम विजय शिवतारे अर्जुन खोतकर नरेश म्हस्के, चंद्रकांत रघुवंशी, आनंदराव अडसूळ अभिजित अडसूळ यांची नावे आघाडीवर आहेत.