Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

केंद्र शासनाकडून बहुमताचा व सत्तेचा दुरुपयोग : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार

team by team
July 30, 2022
in राजकीय
0
केंद्र शासनाकडून बहुमताचा व सत्तेचा दुरुपयोग :  राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार

नंदूरबार । प्रतिनिधी

केंद्र शासनाकडून बहुमताचा व सत्तेचा दुरुपयोग करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले धुळ्यातील राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरण उद्घाटनासाठी आज 30 रोजी झाले त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे निर्धारित वेळेपूर्वीच धुळ्यात दाखल झालेत.उद्घाटनानंतर त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले.
केंद्र सरकार आपल्या सत्तेचा आणि बहुमताचा दुरुपयोग करीत असल्याचा धागा पकडून शरद पवार यांनी परवा संसदेत घडलेल्या प्रसंगाची आठवण करून दिली. ते म्हणाले, काँग्रेसच्या खासदाराकडून राष्ट्रपती बद्दल चुकून राष्ट्रपत्नी असा उल्लेख झाला. अर्थात ही चूकच आहे. त्यांनी तशी माफी मागण्याचीही तयारी दर्शवली. परंतु टीका काँग्रेस पक्षाच्या नेत्यासोनिया गांधी यांच्यावर होत असल्याने त्यांनी दुसऱ्या एका खासदार भगिनीला फक्त एवढीच विचारणा केली की, यात माझा दोष काय? माझ्यावर टीका का करताय? परंतु असे असताना केंद्रातील सत्ताधारी खासदार, मंत्री हे सोनिया गांधींच्या अंगावर चक्क धावून आलेत.

 

मंचावर बसलेल्या अध्यक्षांच्या समोर सुरू असलेला हा प्रकार लोकशाहीला धरून नाही. एवढी हिम्मत यांच्यात आली कुठून, अर्थात बहुमताचा आणि सत्तेचाच हा दुरुपयोग आहे. आम्ही सांगू तेच घडेल आणि आम्हाला हवे तेच बोलावे, अशा पद्धतीने सत्ताधारी वागत आहेत.

 

या देशाला वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे. यातून भारतात सारख्या मोठ्या लोकशाही असलेल्या देशाबद्दल जगभर प्रतिमा मलीन होते आहे. शिवाय सामान्य माणसाला बोलण्याचा अधिकार उरलेला नाही. लोकप्रतिनिधी बोलले तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. इतकेच नव्हे तर अंगावर धावूनही येतात. ही बाब अत्यंत चुकीची असल्याचे शरद पवार म्हणालेत.

 

काही खासदारांनी सोनिया गांधींना तेथून सुखरूप बाहेर काढले नसते तर कदाचित चित्र वेगळे राहिले असते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

शरद पवार पुढे म्हणाले, ज्यांच्या साम्राज्यावरील सूर्य कधी मावळत नाही,अशा इंग्रजांना देखील सामान्य माणसांनी देखील पळवून लावले. त्यांचे साम्राज्य उलटले तेव्हा या हुकूमशहांचे काय? असा असा सवाल करीत देशातील सामान्य माणसांच्या हातात ही ताकद असून ते आपल्या ताकतीचा वापर करतील आणि हुकूम शहांचे सत्ता उठवून लावतील, असा विश्वासही श्री.पवार यांनी धुळ्यात बोलताना व्यक्त केला.

 

 

पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार अनिल गोटे व सहकाऱ्यांनी या राष्ट्रवादी भावनाचे नूतनीकरण केले आहे. यासाठी आज श्री.पवार आले होते. ज्येष्ठ नेते आ.एकनाथ खडसे नंदूरबार जिल्हा अध्यक्ष डॉ.अभिजीत मोटे यांचीही उपस्थिती होती.

बातमी शेअर करा
Previous Post

रावल गढीचा कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा वारसा सरकारसाहेबांनी जोपासला : उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे गौरवोदगार

Next Post

खानदेशातील प्रसिद्ध कानुबाई मातेची आज होणार स्थापना

Next Post
खानदेशातील प्रसिद्ध कानुबाई मातेची आज होणार स्थापना

खानदेशातील प्रसिद्ध कानुबाई मातेची आज होणार स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add