Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

४० वर्षानंतर पूर्ण झालेले देहली धरण पहिल्याच पावसात झाले ओवर फ्लो

team by team
July 20, 2022
in राज्य
0
४० वर्षानंतर पूर्ण झालेले देहली धरण पहिल्याच पावसात झाले ओवर फ्लो

नंदुरबार l प्रतिनिधी
४० वर्षानंतर पूर्ण झालेले देहली धरण पहिल्याच पावसात ओवर फ्लो झाले असून प्रशासन व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून धरण परिसरातील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथील देहली नदीवरील देहली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात झाली आहे.

देहली मध्यम प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी 197.70 मीटरची नोंद झाली आहे. प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी वाहण्यास सूरवात झाली आहे. त्यामुळे परिसराततील ग्रामस्थांनी व नागरिकांनी अंबाबारी येथील देहली मध्यम प्रकल्पातून होणाऱ्या सांडव्याचे मनमोहक दृश्य बघण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून येते.

एकंदरीतच मागील गेल्या 40 वर्षापासून रखडलेले काम यंदा पावसाळ्यापूर्वी युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील बहुचर्चित असा देहली मध्यम प्रकल्प प्रथम वर्षी पहिल्याच पावसात पूर्ण क्षमतेने भरला असून प्रकल्पात 19.08 दल लक्ष घन मिटर इतका जलसाठा उपलब्ध झाल्याने अक्कलकुवा तालुक्यातील शेतकरी व परिसरातील लगतच्या गावांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नसल्याने प्रशासन व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

देहली काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. असे आवाहन नंदूरबार जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आ.ॲड.के.सी.पाडवी यांची बदनामीकारक मजकूर प्रसारीत केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा

Next Post

शिक्षकांची तीव्र नाराजी: अनुदान प्राप्त होऊनही सातव्या वेतन आयोगाच्या दुसर्‍या व तिसर्‍या हप्त्यापासून जिल्ह्यातील शिक्षक वंचित

Next Post
शिक्षकांची तीव्र नाराजी: अनुदान प्राप्त होऊनही सातव्या वेतन आयोगाच्या दुसर्‍या व तिसर्‍या हप्त्यापासून जिल्ह्यातील शिक्षक वंचित

शिक्षकांची तीव्र नाराजी: अनुदान प्राप्त होऊनही सातव्या वेतन आयोगाच्या दुसर्‍या व तिसर्‍या हप्त्यापासून जिल्ह्यातील शिक्षक वंचित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add