नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात पोहायला गेलेल्या 2 विद्यार्थ्यांचां बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या मुक्त विद्यापीठाचा पेपर सुरू असल्याने आज शेवटचा पेपर होता तो पेपर आटपून विद्यार्थी एकत्र पोहोण्यासाठी नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात पोहायला गेले होते.यावेळी 8 मित्र होती. यावेळी विरचक धरणात पाणीसाठा कमी झाला असून मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे.त्यामुळे दोन विद्यार्थ्यांच्या गाळात पाय फासून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे.
जिजामाता महाविद्यालय येथील मुक्त विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी होते येथील दिपक सुनील वाकडे आणि कल्पेश भगवान सोनवणे या दोघांचा मृत्यू या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं असून परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.








