नंदुरबार l प्रतिनिधी
प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटनेची नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.
लवकरच पक्षप्रमुख ना.बच्चु कडू व प्रदेशाध्यक्ष अनिल गांवडे यांच्या मार्गदर्शनानुसार संघटनेची नंदुरबार जिल्हा नवीन कार्यकारिणी लवकरच गठीत करण्यात येईल, अशी माहिती प्रहार जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांनी पत्रकातून दिली आहे.
याबाबत प्रसिध्दीस पत्रक देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्ष तसेच प्रहार शेतकरी संघटनेची सर्व कार्यकारिणी ना.बच्चु कडू यांच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आली आहे.
म्हणुन नवीन जिल्हाध्यक्ष निवड होईपर्यंत कोणीही पदाचा वापर करुन पत्रव्यवहार करु नये. तसेच लवकरच पक्षप्रमुख ना.बच्चु कडू व प्रदेशाध्यक्ष अनिल गांवडे यांच्याशी विचारविनिमय करुन प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटनेची नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्ती करण्यात येणार आहे,
असे प्रहार जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांनी पत्रकातून कळविले आहे.