नंदुरबार | प्रतिनिधी
आदिवासी समाजातील काही नागरीकांनी धर्मांतर केले आहे. त्यांना आदिवासींच्या नावाखाली मिळणार्या सवलती , आरक्षण रद्द करण्यात यावे असे प्रतिपादन ॲड.हिम्मत तावड यांनी तळोदा येथे झालेल्या जनजाती सुरक्षामंच अंतर्गत आदिवासी महासम्मेलनात केले.
देशभरात जनजाती सुरक्षा मंचअंतर्गत ही आदिवासी महासम्मेलन व मोर्चे काढण्यात येत आहेत.त्यांअंतर्गत तळोदा येथे काल आदिवासी महासम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी केन्द्रीय टीम जनजाति सुरक्षामंचचे सचिव ॲड.हिम्मत तावड, केंद्रीय टीम सदस्य व देवगिरी कल्याण आश्रम संयोजक डॉ. विशाल वळवी, क्षेत्रीय सहसंघटन मंत्री देवल्या महाराज, गणेश गावित, सहसचिव देवगिरी प्रांत वीरेंद्र वळवी, देवगिरी कल्याण आश्रम अध्यक्ष गिरीश वसावे,श्रीमती रजुबाई पावरा,श्रीमती कल्पना पाडवी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवातील बिरसा मुंडाचौक पासून स्मारक चौक मेन रोड पर्यंत मोर्चा निघाला. शहरातील वामन बापू मंगल कार्यालय येथे एकत्र येत कार्यक्रमाला याहा मोगी मातेच्या पुजनाने सुरवात झाली.
यावेळी ॲड.हिम्मत तावड म्हणाले कि,जनजाती सुरक्षा मंचअंतर्गत ही आदिवासी महासम्मेलन व मोर्चे अशी मोहीम संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. ही मोहीम राबविण्याचा उद्देश असा आहे की भारतामधील जनजाती समाजातील काही ठिकाणी आदिवासी लोकांनी ख्रिचन, मुसलमान असे विविध धर्मांतर केले आहे.
हे लोक हे दोघी ठिकाणी लाभ घेत आहे. घरकुला पासून तर एम.बी.बी.एसच्या उच्च शिक्षणापर्यंत लाभ घेत आहेत. त्यांनी एकाच ठिकाणी लाभ घ्यावा. आदिवासी लोकांना आपली संस्कृती टिकू द्या ज्यांनी धर्मांतर केले आहे.त्या व्यक्तींनी आदिवासी संस्कृतीचे परंपरेचे जतन करण्याचे कार्य बंद केले आहे.
ज्या आदिवासी लोकांनी आपल्या पूर्वजांची रूढी परंपरा व पूजा पद्धती संस्कृती सोडून दिली आहे व अन्य धर्मांच्या पूजापद्धतीचे आचरण रीतीरिवाज पाहायला सुरुवात केली अशा लोकांना आदिवासी संस्कृती मधून किंवा आदिवासींच्या नावाखाली मिळणार्या सवलती आरक्षण रद्द व्हावे या विषयावर सविधान कलम ३४२ नुसार संशोधन करून अशा लोकांच्या यादी तयार करून त्यांना आदिवासींच्या नावावर मिळणारे फायदे आरक्षण रद्द करण्यात यावे असे प्रतिपादन ॲड. हिम्मत तावड यांनी केले.
ज्या लोकांनी या मोगी मातेला मानत नाही अशा लोकांना आदिवासी म्हणण्याचा अधिकार नाही अशा शब्दात डॉ. विशाल वळवी यांनी डीलिस्टिंग विषयावर बोलतांना सांगीतले. दिवसभराच्या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी नंदुरबार जिल्ह्यातून १५०० पेक्षा जास्त आदिवासी नागरीक उपस्थित होते.