नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील नवी सावरट गावाजवळ
आयटीआय विद्यार्थिनीचा शेवटचा पेपर द्यायला जात असताना अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवापुर तालुक्यातील नवी सावरट गावाजवळ ट्रालाने मोटरसायकलीला कट मारल्याने अपघात झाला आहे.
या अपघातात दुचाकीवरील दोघे महामार्गावर फेकले गेले. यात युवतीचा अंगावरून ट्राला गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे.
त्याच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. वडखुट गावाची रहिवाशी असलेली सुमन गावित अस मयत तरुणीचे नाव असुन ती आयटीआयमध्ये शिक्षण घेत होती.
तिचा आज शेवटचा पेपर असल्याने पेपरसाठी ती घरातुन बाहेर पडली होती. मात्र तिच्यावर काळाने घाला घातला. नवापुर उपजिल्हा रुग्णालयात यावेळी नातेवाईकांचा आक्रोश पहावयास मिळाला.