Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेनेच्या मागणीमुळे जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचयातींचे विभाजन : शिवेसना नेते मा.आ.चंद्रकांत रघुवंशी

Mahesh Patil by Mahesh Patil
May 11, 2022
in राजकीय
0
शिवसेनेच्या मागणीमुळे जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचयातींचे विभाजन : शिवेसना नेते मा.आ.चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील दऱ्या खोऱ्यात वसलेल्या आदिवासी बांधवाचा विकास साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील मोठ्या आणि दुरवच्या ग्रामपंचयातींचे विभाजन करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली होती. अक्राणी येथे विधानसभा प्रचारावेळी आले असतांनाच शिवसैनिकांनी जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचे विभागाज का आवश्यक असल्याची माहीती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनासा आणुन दिली होती असे शिवेसना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, याच अनुशंगाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असुन जिल्ह्यात नव्याने अनेक ग्रामपंचायतींची निर्मीती झाली आहे. या ग्रामपंचायत विभाजणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष प्रयत्न केल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या वतीने या नेत्यांचे विशेष आभार देखील मानत आहोत.
नंदुरबार मध्य विभाजनानंतर मांडवी बु या मोठ्या ग्रामपंचायतींचे विभाजन करुन याठिकाणी नव्याने 8 ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत. यात 11 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तर तोरणमाळ ग्रामपंचायतीचे विभाजन करुन या ठिकाणी देखील नव्याने आठ ग्रामपंचायती निर्माण करण्यात आल्या आहेत. तोरणमाळ मधल्या या आठ ग्रामपंचायतीमध्ये 10 गाव समाविष्ट असणार आहेत. तर तिकडे भुषा ग्रामपंचायतीचे विभाजन करुन याठिकाणी नव्याने तीन ग्रामपंचायतींची निर्मीती करण्यात आली आहे. या तीन ग्रामपंचायतींमध्ये 9 गावांचा समावेश असणार आहे. तर धडगाव मधल्या चिचकाठी ग्रामपंचायतीचे विभाजन करुन चिचकाठी आणि चांदसैली अशा दोन ग्रामपंचायती निर्माण करण्यात आल्या आहेत. तर राजबर्डी ग्रामपंचायतीचे विभाजन करुन नव्याने 7 ग्रामपंचायतींची निर्मीती करण्यात आली आहे. यात सात ग्रामपंचायतीमध्ये 10 गावांचा समावेश असणार आहे. अशा पद्धतीने आता धडगाव नव्याने 27 ग्रामपंचायतींची निर्मीती झाली आहे. तर नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे ग्रामपंचायतीचे देखील विभाजन होवुन आता घुली आणि राकसवाडे अशा दोन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत.
या सर्व ग्रामपंचायत विभाजनासाठी शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी 3 ते 4 महिने सातत्याने पाठपुरावा केला , यासर्व ग्राम पंचायती विभाजन प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके, कृषी सभापती गणेश पराडके, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पराडके यांनी मुख्यमंत्री सह साऱ्या मंत्र्यांचे आभार मानले आहे .नव्याने निर्माण झालेल्या ग्रामपंचायतीचे मुख्यालय गावातच अथवा नजीकच्या गावात असल्याने अनेक दाखले, महत्वांच्या कामांसाठी दऱया खोऱयातल्या आदिवासी मानसांना मदत होणार असुन अतिदुर्गम भागाचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी ग्रामपंचयात विभाजनाचा हा महत्वपुर्ण निर्णय मैलाचा दगड ठरेल असा विश्वास शिवेसना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गौसेवा आणि वृक्ष लागवड विश्वातील सर्वात मोठी सेवा : ह.भ.प. रवींद्र पाठक गुरुजी

Next Post

वर्षा जाधव यांची गाईडचा जिल्हा मुख्यालय आयुक्तपदी निवड

Next Post
वर्षा जाधव यांची गाईडचा जिल्हा मुख्यालय आयुक्तपदी निवड

वर्षा जाधव यांची गाईडचा जिल्हा मुख्यालय आयुक्तपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

October 17, 2025
पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 17, 2025
भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

October 17, 2025
वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

October 17, 2025
गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

October 17, 2025
एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group