नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील मोड येथील दिलीप कथ्थु चौधरी यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या मृत्यू मुळे पर्यावरण प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा तालुक्यातील मोड येथील दिलीप कत्थु पाटील यांच्या सर्वे नंबर २५ मोड शिवारातील असलेल्या जुनाट विहिरीमध्ये मृतावस्थेत बिबट आढळला ज्या विहिरीत बिबट होता ती विहीर कोरडी असून गेल्या २० वर्षापासून या विहिरीत पाणीच नाही. त्यातच बिबट पाच ते सहा दिवसांपूर्वी विहिरीत पडला असेल असा अंदाज आहे व्यक्त करण्यात येत आहे. शेतमालक दिलीप पाटील यांनी दुर्गंधीचा वास कसा येतो आहे.ते पाहण्यासाठी शेतात सर्व बाजूने पाहिले. शेवटी विहिरीत पाहिले असता त्या ठिकाणी त्यांना बिबट पडलेला दिसला. त्यांनी वन अधिकारी यांना फोन लावून सांगितले. वनक्षेत्रपाल निलेश रोढे आणि वन खात्याची संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली आणि बिबट ला त्यांनी विहिरीत विहिरीतून बाहेर काढले. ही या विभागातील तिसरी घटना आहे. या घटनेचे शवविच्छेदन केले असता बिबट मादि गेल्या तीन दिवसांपूर्वी तोंडावर पडल्याने तोंडाचा भाग सर्व खराब झालेला आहे. त्यामुळे तिचा आवाज बंद झाला असावा म्हणूनच ती ४ वर्षाची बिबट मादी मेली असल्याचा अंदाज तळोदा तालुका पशुधन अधिकारी डॉक्टर विश्वासराव नवले यांनी सांगितले. ही मादी १२.२ फूट लांब होती वन अधिकारी वनक्षेत्रपाल निलेश रोढे, जी. पी. गांगुर्डे वनपाल नंदू पाटील, अपर्णा लोहार, डी.आर.खोपे गिरधर पावरा, वीरसिंग पावरा, आर.जे. शिरसाठ डॉक्टर विश्वासराव नवले शेतमालक दिलीप पाटील जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत शेतातच संबंधित बिबटचे अंत्यसंस्कार करण्यात आला.