Public
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public
No Result
View All Result

नंदुरबार येथून नवनिर्धार संवाद अभियानाचा शुभारंभ

Mahesh Patil by Mahesh Patil
July 19, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार येथून  नवनिर्धार संवाद अभियानाचा शुभारंभ

नंदुरबार ! प्रतिनिधी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बहुजनांचे सामाजिक विकासाच्यादृष्टीने विविध समस्या जाणून घेत राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये नवनिर्धार संवाद अभियान राबविले जात असल्याची माहिती बहुजन रयत परिषदेचे प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी दिली. बहुजन रयत परिषदेच्यावतीने राबविल्या जात असलेल्या नवनिर्धार संवाद अभियानाचा नंदुरबार येथून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नंदुरबार न.प.च्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ऍड.कोमल साळुंके उपस्थित होत्या. यावेळी प्रा.ढोबळे म्हणाले, बहुजनांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्याच्या उद्देशाने दि.१८ जुलै ते ५ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये नवनिर्धार संवाद अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानादरम्यान विकासापासून दूर असलेल्या बहुजन समाजाला अ, ब, क, ड वर्ग आरक्षण लागू करणे, शासनाकडून मिळत असलेल्या योजना, विकासात्मक बाबींचा प्रामुख्याने शासनाकडून पाठपुरावा करणे, बहुजन महिलांच्या सशक्तीकरण व सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न करणे व दुर्लक्षित मागास कुटूंबाला आधार देणे, लहुजी सावळे मातंग विकस अभ्यास आयोगाच्या शिफारसी तात्काळ लागू करणे आदी मागण्यांना न्याय देण्यासाठी बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून सदर अभियान राबविले जात असल्याचे ढोबळे म्हणाले. यावेळी रमेश गालफाडे, ऍड.कोमल साळुंके यांनीही मत व्यक्त केले.

बातमी शेअर करा
Previous Post

कोर्टाची पायरी चढविल्याच्या कारणातून विवाहितेचा मारहाण

Next Post

ओबीसींच्या आरक्षणासाठी एक लाखाच्या संख्येने जंतरमंतरवर मोर्चा काढणार: भानुदास माळी

Next Post
ओबीसींच्या आरक्षणासाठी एक लाखाच्या संख्येने जंतरमंतरवर मोर्चा काढणार: भानुदास माळी

ओबीसींच्या आरक्षणासाठी एक लाखाच्या संख्येने जंतरमंतरवर मोर्चा काढणार: भानुदास माळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एस.ए.मिशन येथे १२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

एस.ए.मिशन येथे १२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

June 25, 2022
नवापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात

नवापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात

June 25, 2022
बिलाडी त.सा गावातील घरकुल यादी मध्ये मोठा भ्रष्टाचार ; ग्रामस्थांचा उपोषणाचा ईशारा

बिलाडी त.सा गावातील घरकुल यादी मध्ये मोठा भ्रष्टाचार ; ग्रामस्थांचा उपोषणाचा ईशारा

June 25, 2022
राज्य संस्थाचालक महामंडळावर राजेंद्र कृष्णराव गावित यांनी निवड, भास्करराव पाटील यांनी केला सपत्नीक सत्कार

राज्य संस्थाचालक महामंडळावर राजेंद्र कृष्णराव गावित यांनी निवड, भास्करराव पाटील यांनी केला सपत्नीक सत्कार

June 25, 2022
नागरिकांना नदीतून पुराच्या पाण्यात करावा लागतोय जीवघेणा प्रवास

नागरिकांना नदीतून पुराच्या पाण्यात करावा लागतोय जीवघेणा प्रवास

June 24, 2022
जिल्ह्यात नव्याने बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती गठीत

जिल्ह्यात नव्याने बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती गठीत

June 24, 2022

एकूण वाचक

  • 1,659,162 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group