Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ओबीसींच्या आरक्षणासाठी एक लाखाच्या संख्येने जंतरमंतरवर मोर्चा काढणार: भानुदास माळी

Mahesh Patil by Mahesh Patil
July 19, 2021
in राजकीय
0
ओबीसींच्या आरक्षणासाठी एक लाखाच्या संख्येने जंतरमंतरवर मोर्चा काढणार: भानुदास माळी

नंदुरबार ! प्रतिनिधी
केंद्राच्या आडमुठेपणामुळे राज्यात ओबीसींचे आरक्षण हिरावले गेले आहे. नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाने मागितलेला इम्पिरियल डाटा केंद्र सरकारने सादर न केल्यास एक लाखाच्या संख्येने जंतरमंतरवर मोर्चा काढण्याचा इशारा कॉँग्रेस ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला आहे.यासह दि.९ ऑगस्ट रोजी राज्यात ओबीसी बचावो आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
नंदुरबार येथे कॉँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री ऍड.पद्माकर वळवी, जि.प.अध्यक्षा ऍड.सीमा वळवी, कॉँग्रेस कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सहकार्याध्यक्ष सुभाष पाटील, कॉँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष योगेश चौधरी, राजेश रघुवंशी, जि.प.सदस्य देवमन पवार, पंडीत मराठे आदी उपस्थित होते. यापुढे बोलतांना भानुदास माळी म्हणाले की, राज्यात ओबीसी, दलीत, भटके समाज हक्कासाठी आक्रमक झाला आहे. भाजपाने कॉँग्रेसच्या नेत्यांमध्ये विषारी विचार पेरुन लुबाडले. आता कॉँग्रेसने निर्माण केलेल्या संस्था विकण्याचा डाव भाजपाचा दिसून येत आहे. ओबीसींचे नोकर्‍यांमध्ये, राजकीय आरक्षण संपले आहे. दि.१५ नोव्हेंबरपर्यंत देशाच्या पंतप्रधानांनी आरक्षणासंदर्भातील इम्पिरियल डाटा न्यायालयात सादर केला नाही तर एक लाखाच्या संख्येने कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात जंतरमंतरवर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे माळी यांनी सांगितले. यापुढे ते म्हणाले, केंद्र सरकारने केलेला कायदा हा शेतकरी विरोधी आहे. न्याय व्यवस्थेवर बंधन आल्याची शंका अनेकदा उपस्थित करण्यात येत आहे. अर्थव्यवस्था भांडवलदारांना विकली गेली असल्याचा आरोप माळी यांनी केला. तसेच दि.९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी देखील आंदोलन छेडणार असल्याचे माळी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथून नवनिर्धार संवाद अभियानाचा शुभारंभ

Next Post

कोरोनाच्या संकटामुळे रांझणी येथील योत्रोत्सव रद्द

Next Post
कोरोनाच्या संकटामुळे रांझणी येथील योत्रोत्सव रद्द

कोरोनाच्या संकटामुळे रांझणी येथील योत्रोत्सव रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या पीडीताच्या  कुटुंबीयांना आमदार ॲड.के सी पाडवी यांच्या हस्ते धनादेश वाटप

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या पीडीताच्या कुटुंबीयांना आमदार ॲड.के सी पाडवी यांच्या हस्ते धनादेश वाटप

December 1, 2023
अक्कलकुवा धडगाव मतदार संघात स्थगिती दिलेल्या विविध विकास कामांचा आमदार ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा धडाका

अक्कलकुवा धडगाव मतदार संघात स्थगिती दिलेल्या विविध विकास कामांचा आमदार ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा धडाका

December 1, 2023
विकसित भारत संकल्प यात्रेत शहादा  तालुक्यातील नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

विकसित भारत संकल्प यात्रेत शहादा तालुक्यातील नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

December 1, 2023
नंदुरबार येथे तीन ठिकाणी धाड टाकत सहा लाखांचा गुटखा जप्त

नंदुरबार येथे तीन ठिकाणी धाड टाकत सहा लाखांचा गुटखा जप्त

November 30, 2023
महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावीत

महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावीत

November 30, 2023
डेंग्यू व चिकुन गुनिया आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

डेंग्यू व चिकुन गुनिया आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

November 30, 2023

Total Views

  • 3,682,024 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group