Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल थांबवून गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा गोरक्षकांचा इशारा

Mahesh Patil by Mahesh Patil
July 11, 2021
in क्राईम
0
गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल थांबवून गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा गोरक्षकांचा इशारा

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा हा गेल्या अनेक वर्षांपासून गौतस्करी आणि गोवंश कत्तलीचा बाबतीत कुप्रसिद्ध आहे. जिल्ह्याचा सीमेलगत असलेले गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून नर्मदा नदीतून आणि वाहनाद्वारे मोठया प्रमाणात अवैध गौतस्करी चालते. गौतस्कर हे गोवंश कत्तलीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह मालेगाव, मुंबई येथे वाहतूक करतात. या गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल थांबवून गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच गोरक्षकांनी केलेल्या मागण्या मान्य न झाल्यास दि.१५ जुलैपर्यंत  तीव्र आंदोलन छेडण्याचा गोरक्षकांनी दिला. या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना दिले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, गोरक्षक आणि गौसेवक वेळोवेळी कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या अवैध वाहतुकीचा विरोधात आवाज उठवतात त्यावेळी प्रशासन तात्पुरता स्वरूपाची कारवाई करते त्यामुळे त्यावर पायबंद बसत नाही. प्रशासन कडून कारवाई होत नसल्याने गौरक्षक स्वतःच्या जीव धोक्यात घालून गोवंश वाचविण्याचा प्रयत्न करतात. दि ७ जुलै रोजी अवैध गोवंशाची वाहतूक करणारा ट्रकचा पाठलाग नंदुरबार ते विसरवाडी दरम्यान करतांना गाडीतील गौतस्कर गाडी पकडली जाऊ नये म्हणून गाडीतून लाल मिरची पावडर गौरक्षकांवर फेकत होते जेणेकरून गोरक्षकांचा अपघात व्हावा. नंदुरबार जिल्ह्यात या आठवड्याभरात गोरक्षकांचा सतर्कतेमुळे पोलीस प्रशासनाला दिलेल्या माहितीमुळे ४ ठिकाणी कारवाई  करण्यात आली आहे. हा सर्व भाग लक्षात घेता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बकरी ईद निमित्ताने गोवंशचा हत्येच्या उद्देशाने अवैध वाहतूक होत आहे आणि अशी गोवंशाची अवैध वाहतूक कायमच होत असते, तरी यावर कायमस्वरूपी पायबंद घातला जावा प्रशासनाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुकांसह तातडीने उपाययोजना करून गोवंशाचा जीवाचे रक्षण करावे. अवैध गोवंश वाहतूक व कत्तल थांबविण्यासाठी जिल्हाभरात कायमस्वरूपी चेकपोस्ट निर्माण करण्यात यावे.गोवंश हत्याबंदी पथक निर्माण करून त्यावर जिल्ह्यात वरिष्ठ अधिकार्‍यांनी (उपविभागीय पोलीस अधिकारी) नेमणूक करावी व प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत अशी पथके कायमस्वरूपी निर्माण करून स्थानिक पोलीस अधिकारी नेमणूक करावी.पथकातील सर्व अधिकारी आणि यांचे संपर्क क्रमांक सार्वजनिक करावा, प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंश हत्याबंदी पथकात स्थानिक गौरक्षक- गौसेवक यांचीही नियुक्ती करून  त्यांना ओळखपत्र प्रदान करण्यात यावे. गोवंश पकडल्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करावी.अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक सोसायटीचे सदस्य ऍड रोहन गिरासे, विश्व हिंदू परिषदेचे अजय कासार, गौरक्षक भूषण पाटील, खुशाल भोई, धर्मसेवक मयुर चौधरी, सुमित परदेशी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे दिग्विजय ठाकरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात पावसा अभावी सहा लघुप्रकल्पांनी गाठला तळ

Next Post

नवापूर येथे कोरोना संसर्ग मुळे निधन झालेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना एक लाखाची मदत

Next Post
नवापूर येथे कोरोना संसर्ग मुळे निधन झालेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना एक लाखाची मदत

नवापूर येथे कोरोना संसर्ग मुळे निधन झालेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना एक लाखाची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा येथे त्वरित विजेची सोय करा,शिंदे शिवसेनेची मागणी

याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा येथे त्वरित विजेची सोय करा,शिंदे शिवसेनेची मागणी

December 18, 2025
खाकीसाठी जिद्दीची धाव; युवा उमेदवारांसाठी भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे ऐतिहासिक सराव चाचणी; ६०० हून अधिक तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग

खाकीसाठी जिद्दीची धाव; युवा उमेदवारांसाठी भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे ऐतिहासिक सराव चाचणी; ६०० हून अधिक तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग

December 18, 2025
राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वैष्णवी मानकरला सुवर्णपदक

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वैष्णवी मानकरला सुवर्णपदक

December 18, 2025
समुद्रावर नंदनगरीचा ठसा! दहा किमी सागरी जलतरणात देव राजपूत राज्यात आठवा

समुद्रावर नंदनगरीचा ठसा! दहा किमी सागरी जलतरणात देव राजपूत राज्यात आठवा

December 18, 2025
नंदुरबारसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यांत सेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, उल्लेखनीय कामगिरीचा नाशिक येथे गौरव

नंदुरबारसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यांत सेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, उल्लेखनीय कामगिरीचा नाशिक येथे गौरव

December 18, 2025
नंदुरबार शहरातील वाढीव व अतिरिक्त घरपट्टीची सक्ती रद्द करा ,उबाठा गटाची मागणी

नंदुरबार शहरातील वाढीव व अतिरिक्त घरपट्टीची सक्ती रद्द करा ,उबाठा गटाची मागणी

December 18, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group