नंदुरबार l प्रतिनिधी-
अक्कलकुवा येथील येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची शिरपूर येथे भेट घेतली. त्यावेळी दुर्गम भागातील विविध विकासकामांचे मुद्दे आणि प्रश्न त्यांनी मांडले असता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रकरणी लवकरच दखल घेऊ असे आश्वासन दिले.
अक्कलकुवा माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा ज्येष्ठ कार्यकर्ते प्रताप वळवी, भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष नितेश वळवी, महेश तवर, उमेश पाडवी, अमृत चौधरी, जगदीश दादा वसावे, सुधीर पाडवी आणि अन्य या प्रसंगी उपस्थित होते. माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित तसेच संसद रत्न डॉ. हिना गावित यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या विविध विकासकामातील अडचणी, अक्कलकुवा भागातील दुर्लक्षित केले जाणारे विकासकाम, प्रशासनातील अडथळे याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी लक्ष वेधले.
दुर्गम भागातील जनतेशी संबंधित हे सर्व प्रश्न तातडीने सोडवले जातील तसेच निधी प्राप्त होण्याच्या मार्गातील अडथळे व विकास कामातील अडथळे लवकरच दूर केल्या जातील असे त्यांनी आश्वासन दिले.








