तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
नंदुरबार l प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणूकासंदर्भात रणनिती आखण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यंदा अनुकुल वातावरण असून जि. प. मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी केले.
तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
तळोदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सायंकाळी पार पडली. या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साह दिसून आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष मोहन शेवाळे, सोशल मिडीया सेलचे अध्यक्ष छोटू कुंवर, तळोदा तालुका अध्यक्ष मगन ठाकरे, रामपूरचे सरपंच दीपक वळवी, माजी सभापती यशवंत ठाकरे, मोडचे सरपंच पुंडलीक राजपूत यांसह संदीप वळवी, सचिन ठाकरे, विलास गावित, विजय मावची, फतू पाडवी, मधूकर ठाकरे, कुंवरसिंग मोरे, सुहास वळवी, युवराज अशोक वळवी, विकास ठाकरे, विशालत वळवी, शिवा पावरा, खुशाल पावरा, प्रशांत पटलते, सांगदेव वळवी, रणसिंगभाऊ पाडवी, हूपसिंग सुरत्या नाईक, आंबूलाल वळवी, दिनेश वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
शासकीय विश्राम गृहावर तब्बल दोन तास बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे म्हणाले, आपल्या समोर कितीही दिग्गज़ येवू दया. आपला पक्षही आता मजबूत झाला आहे. पक्ष मजबूतीसाठी आपले नेते अजितदादा पवार यांनी या जिल्हयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पालकमंत्री दिला., तसेच जिल्हयाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करीत आहेत.
आपला पक्ष हा सर्वधर्म समभाव मानणारा आहे. हे समाजात बिंबवा. तसेच विकासाच्या मुद्दयावरच आपली लढाई असणार आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकत्यांनी जास्तीत जास्त परीश्रम घेवून आगामी जि प निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावा. पक्षाच्या पातळीवरुन सर्वतोपरी मदतीचा हात दिला जाईल.
पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहचवा. सत्तेची चावी आपल्याच हातात असेल, हे लक्षात घ्या. मोहन शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दिपक दशरथ वळवी यांची युवक जिल्हाउपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, तळोदा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने ज्या उमेदवारांना रिंगणात उभे राहायचे आहे, अशा सर्व उमेदवारांनी आत्ता पासूनच कामाला लागावे असेही आढावा बैठकीत आवाहन करण्यात आले.