मोलगी | रविंद्र वळवी
अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील पिंपळखुंटा गमन रस्त्यावरुन जाताना पिकअपवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गमनचा उमरपाडा भागातील देवनदीत पिकअप वाहन कोसळल्याने झालेल्या अपघातात पिकअप मधील दोघे जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात वाहनाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 14 एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कैलास सुरेश पाटील रा. ध्रुवनगर नाशिक हा त्याच्या ताब्यातील एमएच १८ ए ए 47 33 या पिकअप वाहनामध्ये प्रवासी बसून अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुंटा ते गमन रस्त्याने जात होता त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालविल्याने उमरपाडा गावाजवळ त्याचा वाहनावरील ताबा सुटला यात पिकअप वाहन थेट देवनदीत कोसळले या अपघातात राजू ओंकार बारेला वय वर्ष 30 राहणार कर्जांना ता. चोपडा व पोपट दत्तू ससाने वय 40 रा. नाशिक असे दोघे गंभीर जखमी झाल्याने ते जागीच ठार झाले तर या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ज्ञानेश्वर उत्तम वाघ राहणार कुंजर ता. चाळीसगाव, सुनील बड्या पावरा वय 20 राहणार खर्डीखुर्द चा पाटीलपाडा ता.धडगाव व कैलास सुरेश पाटील वय 38 राहणार ध्रुवनगर नाशिक यांचा जखमींमध्ये समावेश आहे. या अपघातात वाहनाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत ज्ञानेश्वर उत्तम वाघ यांच्या फिर्यादीवरुन पिकअप चालक कैलास पाटील याचे विरोधात मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गाडीलोहार हे करीत आहेत