नंदुरबार l प्रतिनिधी
आजचा समाज हा दिशाहीन झाला असून तरुण पिढी ही व्यसनाधीन झाली आहे. मुलांना सुसंस्कृत करावे त्यांना अध्यात्मिक ठेवावे जेणेकरून समाज हा सुसंस्कृत व आध्यात्मिक बनेल असे उदगार सत्यभामा अमृत पवर्तक समूहाचे पोथी प्रवचक सतीश दादाजी अमृते यांनी त्यांच्या अमृतवाणीतून सांगितले. नंदुरबार येथील विमल हौसिंग सोसायटी येथे श्रीमद् भगवदगीता प्रवचन सोहळा व लोळाचरित्र तथा संस्कार शिबिर याचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराला मार्गदर्शन करत असताना सतीश दादाजी अमृते यांनी सांगितले की मुला मुलांना संस्कृत व आध्यात्मिक बनवण्यासाठी अशा सोहळ्यांचे आयोजन करण्यात येत असते.
भगवद् गीतेत संपूर्ण विश्वाचे सार कृष्ण भगवानने अर्जुनांला निमित्त करून विश्वाला सांगितले आहे .आपण कर्म करत असताना दोन प्रकारचे कर्म करत असतो. सकाम कर्म व निष्काम कर्म . सकाम कर्म आपणास काही देणार नाही पण निष्काम कर्म आपल्याला भगवंताकडे घेऊन जाणार .भगवंताने गीताचा माध्यमातून सांगितले आहे की परमेश्वर प्राप्ती शिवाय तुमचा जीवनात उद्धार होणार नाही त्यासाठी या भगवद् गीतेचा जन्म झाला आहे .
मानभाऊ पंथ म्हणजे एकनिष्ठ भक्ती करणारा संप्रदाय आहे .या संप्रदायाच्या माध्यमातून लाखो लोकांना व्यसनमुक्त करण्यात आले आहे .या लाखो लोकांच्या जीवनात आज शांती प्रस्थापित झाली आहे. आपल्याही जीवनात भगवद् गीताच्या माध्यमातून शांती प्रस्थापित करावी असा संकल्प आपण करावा. मानभाऊ पंथात संकल्प ला महत्व दिले गेले आहे .
जोपर्यंत आपण संकल्प करत नाही तोपर्यंत कोणतीही वस्तू ग्राह धरली जात नाही म्हणून आपण चांगले होण्याचा संकल्प करावा .श्रीमद् भगवद् गीता प्रवचन सोहळा हा 12 दिवस चालतो यात भगवद् गीताचे जीवनमूल्य सांगितले जातात. कर्म कशा प्रकारे करावे स्थित पद्य, संन्यास म्हणजे काय , संयम म्हणजे काय हे शिक्षण व श्लोकच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचवण्या साठी या श्रीमद् भागवत प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे असे पोथी प्रवचक सतीश दादाजी अमृते यांनी सांगितले. या प्रवचन सोहळ्याला आयोजक मंगला गिरासे ,प्रेमसिंग गिरासे, अपर्णा गिरासे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.