नंदुरबार l प्रतिनिधी
छत्तीसगड राज्यातील हंस देव जंगलाची उन्हाळी वृक्षतोड थांबवा अशी मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेतर्फे करण्यात आली.
या निवेदनात म्हटले आहे की, छत्तीसगढ राज्यातील सरगुजा जिल्ह्यातील उदयपूर परिसरातील घाटबर्याच्या पेड्रामार जंगल आदिवासींचे देवस्थान असलेले हसदेव जंगलाचा संपुर्ण परिसर भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचित येत असून हे जैवविविधतेने नटलेला असून लाखो आयुर्वेदिक वनस्पती , झाडे – झुडपे व काही लुप्त होणाऱ्या दुर्मिळ वनस्पती येथे असून पक्षांच्या व फुलपाखरांच्या हजारो जाती वास्तव्यास असून हजारो प्राण्यांच्या जाती जंगलात असून हत्तीचे अनेक कळपसुध्दा आहेत. जंगलातील ९ २ हेक्टर क्षेत्र गौतम अदानी या उद्योगपतीला कोळशाच्या खाणीच्या उत्खननासाठी सदर क्षेत्र बेकायदेशीररित्या दिले असून ४५० पेक्षा जास्त जवान हसदेवच्या जंगलात तैनात करून त्यांच्या निगरानीखाली ५०० पेक्षा जास्त पेटोलवर चालणारे आरे मशिनचा वापर करुन जंगलाची बेसुमार कत्तल करण्याचे काम सुरु केलेले असून
आरे मशिनच्या आवाजाने जंगलातील पशु पक्षी , प्राणी व हत्तींचे कळपाचे कळप खेडेगावात आश्रयाला आलेले असल्यामुळे आजुबाजुला राहणान्या स्थानिक आदिवासींचा जंगल तोडीला प्रचंड विरोध असून हसदेव जंगल वाचविण्यासाठी आंदोलने सुध्दा सुरु झालेली आहेत . त्यामुळे आंदोलनकर्त्यांांना बेकायदेशीररित्या पोलीस बंदोबस्तात डांबुन ठेवण्यात आलेले आहे . महोदयांना विनंती की , भारतीय संविधानातील पाचव्या अनुसूचिनुसार ना लोकसभा ना राज्यसभा सर्वोच्च ग्रामसभेला अधिकार बहाल केलेले असतांना गावातील ग्रामसभांचे ठराव न घेता व ट्रायबल एडवायझरी कौन्सिलचा अभिप्राय न घेता पोलीस बंदोबस्तात एकतर्फी जंगलतोडीचे काम सुरु कलेले असून
त्यामुळे पर्यावरणाला व जैवविविधतेला धोका निर्माण झालला असून भविष्यात सुध्दा ऑक्सिजन मिळणार नसून वाळवंट सदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे तापमानात प्रचंड वाढ होणार असून मानवजातीला जगणे कठीण होणार आहे . महोदयांना विनंती की . जंगलातील खनिज संपत्तीच्या लालसेपोटी विकासाच्या नावाने होणारे विनाश टाळून मानवतेच्या दृष्टिकोनातून पर्यावरण व जैवविधितेने नटलेल्या हसदेव जंगलाची सुरु केलेली बेसुमार वृक्षतोड तात्काळ थांबविण्याचा आदेश पारित करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे या आशयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले .
यावेळी उपजिल्हाप्रमुख के टी गावित विजय ठाकरे ,अरुण गावित सुरेश वळवी ,हिरामण पाडवी वासुदेव गांगुर्डे, अजय वळवी किशोर वळवी, डॉ संतोष चव्हाण ,एलिया गावित व कार्यकर्ते उपस्थित होते.