नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र सरकारची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना बारा बलुतेदार समाजासाठी नवसंजीवनी असून आपले पारंपरिक व्यवसाय करण्यासाठी या योजनेद्वारे ओबीसी बांधवांना बळ मिळणार आहे.केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे नाममात्र व्याजदराने कर्ज घेऊन आपला व्यवसाय वाढवावा, असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी केले.
नंदुरबार येथील कन्यादान मंगल कार्यालयात भाजपा ओबीसी मोर्चा तर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश माळी ,भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी,हिरामण गवळी,भरत महाजन,शामकांत ईशी,आकाश अहिरे भारतीय सोनवणे, काजल मछले, सरिता चौधरी, सपना अग्रवाल,नरेंद्र माळी,संतोष वसईकर, प्रवीण गुरव, लक्ष्मण माळी, भीमसिंग राजपूत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अविनाश माळी यांनी प्रास्ताविक केले. कुंभार, माळी, सुतार, लोहार, नाभिक, धोबी, शिंपी, मिस्त्री यांच्यासह सर्व ओबीसी समाज बांधवांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय वाढवावा याबाबतची माहिती त्यांनी प्रास्ताविकातून दिली. तर ईश्वर साठे यांनी या योजनेबाबत सविस्तर अर्ज कसा करावा, प्रशिक्षण कसे दिले जाईल याची माहिती दिली.
याप्रसंगी निलेश माळी, हिरामण गवळी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन केतन गीते यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पगारे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोज माळी,दिनेश माळी, अक्षय माळी, दीपक महाजन, खुशाल चौधरी, जयेश चौधरी, नीरज जाधव, राहुल माळी,देविदास माळी, विशाल महाजन,विनोद अहिरे, रमाशंकर माळी,मधुकर माळी, राजकुमार माळी यांनी परीश्रम घेतले.